शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
4
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
5
वयाच्या १५ व्या वर्षीच अक्षय कुमारच्या लेकाने सोडलंय घर, आरवच्या सवयी वाचून व्हाल शॉक!
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
7
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
8
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
9
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
10
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
11
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
12
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
13
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
14
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
15
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
16
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
17
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
18
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
19
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
20
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ

अधिवेशनात नगरची खिंड लढविणार 'चार मंत्री'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 10:04 AM

महाविकास आघाडीच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नगरचे हे चार मंत्री कशी बाजू मांडतात, यावर अर्थसंकल्पातील नगरचे स्थान ठरणार आहे. त्यामुळे चारही मंत्र्यांच्या भूमिकेकडे नगर जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

अहमदनगर : आजपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे चार मंत्री नगरचे प्रतिनिधित्व करणार आहेत. महाविकास आघाडीच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नगरचे हे चार मंत्री कशी बाजू मांडतात, यावर अर्थसंकल्पातील नगरचे स्थान ठरणार आहे. त्यामुळे चारही मंत्र्यांच्या भूमिकेकडे नगर जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळात नगर जिल्ह्याला झुकते माप दिले. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्या रुपाने नगर जिल्ह्याला महसूलमंत्री पद मिळाले. नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांना सेनेच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. राष्ट्रवादीने नगरविकास खात्याचे राज्यमंत्री पद आमदार प्राजक्त तनपुरे यांना बहाल केले आहे. पालकमंत्री पदही राष्ट्रवादीने आपल्या कोट्यात घेतले. पालकमंत्री अन्य जिल्ह्यातील असले तरी अन्य तीन मंत्री हे नगर जिल्ह्यात आहे. त्यामुळे नगरकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. अर्थसंकल्पात भरीव तरतूद करून जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करणे शक्य आहे.

अर्थ व नियोजन खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. नाशिक येथे झालेल्या विभागीय बैठकीत त्यांनी नगरच्या भुईकोट किल्ल्यासाठी भरीव निधीची तरतूद केली. त्यांचे नगर जिल्ह्यावर विशेष लक्ष असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे. नगर जिल्ह्यातील मतदार राजाने राष्ट्रवादीचे सहा आमदार विधानसभेत पाठविले. त्याची परतफेड राष्ट्रवादी काँग्रेस अर्थसंकल्पात भरीव तरतूद करुन करणार का?, असा सवाल जिल्ह्यातील जाणकारांकडून उपस्थित केला जात आहे.

रखडलेली विकास कामेभुईकोट किल्ला सुशोभिकरण, शाळा खोल्यांची दुरुस्ती, रस्त्यांची दुरवस्था, महामार्गाची अर्धवट कामे, जिल्हा प्रशासनाची नवीन इमारत, नगर शहरातील नाटगृह, गड किल्ल्यांचे सुशोभिकरण, पर्यटन क्षेत्रांचा खुटलेला विकास, पाणी योजनांची बोंबाबोंब, यासह जिल्ह्यातील अनेक प्रश्न तुंबलेले आहेत. काही कामांच्या फायली मंत्रालयात धूळखात पडून आहे. त्यावर जिल्ह्याचे कारभारी आवाज उठविणार का हा खरा प्रश्न आहे.

शहरातील रस्त्यांचा ७०० कोटींचा आराखडाआमदार संग्राम जगताप यांच्या सूचनेनुसार महापालिकेने शहरातील विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचा ७०० कोटींचा आराखडा तयार केला आहे. यापूर्वीच्या सरकारने ३०० कोटींची घोषणा केली होती. पण, निधी मिळाला नाही. जगताप यांच्या रुपाने नगर शहराला अनेक वर्षानितर सताधारी पक्षाचे आमदार लाभले आहेत. त्यांच्याकडून नगरकरांना मोठ्या अपेक्षा आहेत.