शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
4
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
5
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
6
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
7
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
8
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
9
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
10
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
11
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
12
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
13
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
14
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
15
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
16
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
17
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
18
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
19
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
20
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीतीने राज्यात रोजगार हमीवरील मजुरांची संख्या घटली

By सुदाम देशमुख | Published: November 29, 2020 12:18 PM

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्या नोव्हेंबरमध्ये घटली आहे. दिवाळीसाठी घरी गेलेल्यांपैकी निम्मे मजूर पुन्हा कामावर आलेच नाहीत. थंडीचे दिवस, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची शक्यता व्यक्त झाल्याने मजुरांनी कामाकडे पाठ फिरवली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ३ ते ४ हजार मजूर कमी झाल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्या नोव्हेंबरमध्ये घटली आहे. दिवाळीसाठी घरी गेलेल्यांपैकी निम्मे मजूर पुन्हा कामावर आलेच नाहीत. थंडीचे दिवस, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची शक्यता व्यक्त झाल्याने मजुरांनी कामाकडे पाठ फिरवली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ३ ते ४ हजार मजूर कमी झाल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामासाठी कुटुंबांची नोंदणी केली जाते. यावर्षी ९५ लाख जॉबकार्ड वाटप करण्यात आले होते. मात्र, ऐन मार्चा-एप्रिलमध्येच यंदा कोरोना महामारीचे संकट आले. त्यामुळे नोंदणी केलेल्यांपैकी ३० लाख ९२ हजार एवढेच जॉबकार्ड ॲक्टिव्ह राहिलेले आहेत. या कार्डानुसार २ कोटी २७ लाख ४३ हजार मजुरांनी कामासाठी नोंदणी केली होती. त्यात फक्त ५९ लाख १६ हजार मजूर प्रत्यक्ष कामावर होते. नोंदणी केलेल्या मजुरांपैकी प्रत्यक्ष काम करणाऱ्या मजुरांचे हे प्रमाण १३.५९ टक्के इतके राहिलेले आहे, असे महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.

यंदा मार्च-एप्रिल-मेमध्ये कोरोनामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन होता. मजुरांना स्थानिक परिसरात काम देण्यात येते. त्यामुळे रोजगार हमीच्या कामांवर सरासरी तीन लाख कुटुबांनी कामावर हजेरी लावली. जूननंतर पावसाळा सुरू झाल्याने तसेच कामे कमी झाल्याने मजुरांची संख्या निम्म्यावर आली. जुलै ते ऑक्टोबरपर्यंतच्या सरासरीपेक्षा नोव्हेंबरमधील मजुरांची उपस्थिती निम्म्यावर आली आहे. नोव्हेंबरमध्ये अनेक मजूर दिवाळी सणामुळे कामावर आलेच नाहीत.

दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कारणामुळे मजुरांची पुन्हा कामावर येण्याची मानसिकता नसल्याचे चित्र आहे. अहमदनगर जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये ७ हजार कुटुंब कामावर होते. ही संख्या ४ हजारांपर्यंत कमी झाली आहे. राज्यातही अशीच परिस्थिती असल्याचे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे केंद्र सरकारतर्फे दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना नोव्हेंबरपर्यंत धान्याचे मोफत वाटप झाले. त्याचाही फटका रोजगार हमी योजनेला बसला आहे. एप्रिल ते ऑक्टोबर महिन्याची स्थिती पाहता नोव्हेंबमध्ये मजूर कुटुंबांची संख्या निम्म्यापर्यंत कमी झाली आहे. सध्या कामावर असलेल्या कुटुंबांमध्ये औरंगाबाद (१७८७५), नंदुरबार (७१७०), नागपूर (९६०२) या तीन जिल्ह्यात सर्वाधिक कुटुंब कामावर आहेत. तर अहमदह्र जिल्ह्यात (६३२२) कुटुंब काम करीत आहेत.

रोजगार हमी योजनेची स्थिती

एकूण जॉबकार्ड वाटप- ९५ लाख ८९ हजार

ॲक्टिव्ह जॉबकार्ड- ३० लाख ९२ हजार

मजुरांची नोंदणी- २ कोटी २७ लाख ४३ हजार

ॲक्टिव्ह मजूर- ५९ लाख १६ लाख

रोजगार हमीवरील कुटुंबसंख्या (२०२०)

एप्रिल             १,९८,७०१

मे             ६,८९,६३७

जून             ५,५२,५७२

जुलै             ३, ०२,०६४

ऑगस्ट             २.०६,२०३

सप्टेंबर             २,२९,९३७

ऑक्टोबर             २,२८,३६१

नोव्हेंबर             १,३३,२१७

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLabourकामगार