शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

सरकारमध्ये शेतक-यांची मुले हवीत-सचिन पायलट;  खांडेकर, गांधी, शेरकर यांना संगमनेरात पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 6:28 PM

देशातील नियम व कायदे बनविण्यासाठी विधानसभा आणि लोकसभेत शेतक-यांची मुले पाहिजेत. त्यांनी शेतीप्रधान भारताच्या नागरिकांसाठी चांगले काम केले पाहिजे. महाराष्ट्रात नव्याने आलेल्या महाआघाडी सरकारकडून जनतेच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण होतील, असे मत राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी व्यक्त केले. 

संगमनेर : देशातील नियम व कायदे बनविण्यासाठी विधानसभा आणि लोकसभेत शेतक-यांची मुले पाहिजेत. त्यांनी शेतीप्रधान भारताच्या नागरिकांसाठी चांगले काम केले पाहिजे. महाराष्ट्रात नव्याने आलेल्या महाआघाडी सरकारकडून जनतेच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण होतील, असे मत राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी व्यक्त केले. मालपाणी लॉन्स येथे झालेल्या स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ््यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभचे अध्यक्ष नाना पटोले होते. व्यासपीठावर महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, डॉ. गिरीश गांधी, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आमदार डॉ.किरण लहामटे, आमदार हिरामण खोसकर उपस्थित होते. पायलट पुढे म्हणाले, महाराष्ट्र व राजस्थानचे पुर्वीपासूनचे विश्वासाचे दृढ नाते आहे.  महसूलमंत्री थोरात यांच्यातील नम्रता व प्रत्येकाच्या हदयातील असणारे स्थान हे नव्या पिढीसाठी अनुकरणीय आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी केलेल्या रचनात्मक व दिशादर्शक कामामुळे नगरचे नाव देशपातळीवर आहे. खांडेकर, गांधी, शेरकर यांना पुरस्कारअमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने सहकार, साहित्य, समाजसेवा, पर्यावरण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणा-या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार व एक लाख रुपये रोख रक्कम एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांना प्रदान करण्यात आला. डॉ. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार व एक लाख रुपये रोख रक्कम. पर्यावरणामध्ये डॉ. गिरीश गांधी यांना तर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार सत्यशील व योगिता शेरकर यांना स्मृतीचिन्ह व एकावन्न हजार रुपयांची रोख रक्कम या पुरस्काराने  गौरविण्यात आले.राज्यात ब्रम्हा, विष्णू, महेश असे विकासाचे सरकार नाना पटोले म्हणाले, सध्या राज्यात ब्रम्हा, विष्णू व महेश असे विकासाचे सरकार आहे. या सरकारने प्रथम शेतक-यांची कर्जमाफी करुन एक मोठा ऐतिहासीक निर्णय घेतला आहे. मी विधानसभा अध्यक्ष म्हणून जनतेचा प्रतिनिधी म्हणून काम करीत असून जनतेची कामे सरकारकडून करुन घेणार आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातSangamnerसंगमनेर