शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ने हटवले आठशे टँकर!

By चंद्रकांत शेळके | Published: February 13, 2018 3:28 PM

दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘जलयुक्त शिवार’ ही योजना पुढे आली अन् त्याचे सकारात्मक परिणाम अवघ्या दोन-तीन वर्षांत दिसू लागले. नगर जिल्हा तर या योजनेत अग्रेसर ठरला.

चंद्रकांत शेळकेअहमदनगर : दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘जलयुक्त शिवार’ ही योजना पुढे आली अन् त्याचे सकारात्मक परिणाम अवघ्या दोन-तीन वर्षांत दिसू लागले. नगर जिल्हा तर या योजनेत अग्रेसर ठरला. आतापर्यंत या योजनेतून अर्धा जिल्हा (५४७ गावे) पाणीदार झाला असून दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात सुरू असलेले ८०० टँकर आज अक्षरश: शून्य झाले आहेत. यावरूनच या योजनेची यशस्वी घोडदौड लक्षात यावी.राज्याच्या सतत होणा-या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘जलयुक्त शिवार’ अभियान ही नवी योजना राबविण्याचा निर्णय घेतला. या योजनेनुसार जलसंधारणांतर्गत सर्वसमावेशक उपाययोजनाद्वारे एकात्मिक पद्धतीने शाश्वत शेतीसाठी पाणी आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले. त्यातून २०१९पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्याचा निर्धार जरी मुख्यमंत्र्यांनी केला असला तरी त्याला सरकारी अधिकाºयांचे उत्तम नियोजन व लोकसहभागाची जोड मिळाल्याने ही योजना दोन वर्षांतच कमालीची यशस्वी ठरली.सन २०१४-१५पर्यंत भूजल पातळीत २ मीटरपेक्षा जास्त घट झाली होती. त्यामुळे प्राधान्याने अशी गावे निवडून या योजनेचे काम सुरू झाले. पिण्याचे पाणी व पिकास संरक्षित सिंचन देण्याची व्यवस्था निश्चितपणे निर्माण होईल, अशी शाश्वती अधिका-यांनी शेतक-यांना दिल्याने लोकसहभाग आपोआपच वाढला.पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविणे, भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे, सिंचन क्षेत्रात वाढ करून शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करण्याची शाश्वता निर्माण करणे, भूजल अधिनियमाची अंमलबजावणी, विकेंद्रीत पाणीसाठा निर्माण करणे, पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे, अस्तित्वात असलेले व निकामी झालेले बंधारे, गावतलाव, पाझरतलाव, सिमेंट बंधारे आदी जलस्त्रोतांची साठवण क्षमता वाढविणे, जलस्त्रोतांतील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढविणे, पाण्याच्या ताळेबंदाबाबत आणि कार्यक्षम वापराबाबत प्रभावी जनजागृती, तसेच वृक्षलागवडीस प्राधान्य देणे असा हा जंबो कार्यक्रम एका मिशनअंतर्गत सुरू झाला.राज्यासह नगर जिल्ह्यातही सन २०१५-१६पासून या अभियानाने गती घेतली. कृषी, वन, सामाजिक वनीकरण, लघुसिंचन, जलसंपदा, जिल्हा परिषदेकडील कृषी व लघुसिंचन, पाणी पुरवठा, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, स्वच्छता अशा जिल्हास्तरीय यंत्रणांमध्ये समन्वय राखून हे अभियान राबविण्यात आले.

दोन वर्षांची पेरणी, तिस-या वर्षी फळ

जलयुक्त शिवार अंतर्गत सन २०१५-१६ या वर्षात नगर जिल्ह्यातील २७९ गावांत तब्बल १४ हजार ६४८ कामे पूर्ण झाली. त्यासाठी शासनाने २०६ कोटींचा खर्च केला. हे वर्ष कमालीचे यशस्वी ठरल्याने पुढील २०१६-१७ वर्षात शासकीय अधिका-यांसह ग्रामस्थांचाही विश्वास दुणावला व पुन्हा २६८ गावांत ८३३४ कामे पूर्ण झाली. त्यासाठी सुमारे दीडशे कोटींचा खर्च झाला. त्यातील काही गावांतील कामे अजूनही सुरू आहेत. दरम्यान ही कामे सुरू असताना किंवा त्याआधी दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा ठरलेला होता. २०१६मध्ये जिल्ह्यात तब्बल ८२६ टँकरद्वारे ५१६ गावे व तीन हजार वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा सुरू होता. शासनाने जलयुक्तची पेरणी केलेली होती, अवधी होता तो केवळ वरूणराजाच्या हजेरीचा. नशिबाने ही अपेक्षाही २०१७च्या पावसाळ्यात पूर्ण झाली. त्या वर्षी रेकॉर्डबे्रक पाऊस झाल्याने जलयुक्तच्या या ५४७ गावांचे शिवार फुलले. आजमितीस सर्व गावांत पाणी असून कोठेही टँकर सुरू नाही.

टंचाई खर्चात बचत

सन २०१४-१५मध्ये ३९ कोटी, तर २०१५-१६मध्ये ७० कोटी खर्चाचा टंचाई आढावा शासनाने तयार केला. त्यावर तो खर्चही झाला. परंतु पुढे जलयुक्तही कामे झाल्याने यंदाचा टंचाई उपाययोजनांचा खर्च केवळ ६ कोटी ८७ लाखांचा आहे.पाणीटंचाई आढावावर्ष       टँकर    गावे२०१२   २८९    २७२२०१३   ७०७    ५००२०१४   ३६९    २८५२०१५   ५२१    ३७७२०१६   ८२६    ५१६२०१७   ११४    ७०२०१८    ०        ०

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJalyukt Shivarजलयुक्त शिवार