शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनास शिक्षण विभागाची टाळाटाळ; नगर जिल्ह्यात शिक्षकांमध्ये नाराजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 7:32 PM

अहमदनगर जिल्हा परिषद शाळेतील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन करण्यास शिक्षण विभागाकडून टाळाळ सुरू असून, येत्या दोन दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश ग्रामविकास खात्याने दिला आहे.

अहमदनगर: जिल्हा परिषद शाळेतील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन करण्यास शिक्षण विभागाकडून टाळाळ सुरू असून, येत्या दोन दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश ग्रामविकास खात्याने दिला आहे. पुढील दोन दिवसांत समायोजन करून अहवाल ग्रामविकास कार्यालयास सादर केला जाणार आहे.ग्रामविकास व जलसंधारण विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचा आदेश दिला आहे. जिल्हांतर्गत बदल्यांपूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षण विभागाला शिक्षकांचे समायोजन करण्याचा आदेश दिला आहे. परंतु, जिल्हा परिषदेने समायोजनाची प्रक्रिया अद्याप सुरूच केलेली नाही. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या प्रक्रियेबाबत ग्रामविकास विभागाचे सचिव प्रि. श. कांबळे यांनी नाराजी व्यक्त करत येत्या दोन दिवसांत समायोजन करण्याची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले आहेत.जिल्हांतर्गत बदलीची प्रक्रिया मुदतीत पूर्ण केली जाणार आहे. मात्र समायोजनाची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून संच मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे पुढील प्रक्रिया खोळंबली असल्याने ग्रामविकास खात्याने नाराजी व्यक्त केली आहे. शाळेतील विद्यार्थी संख्या, मंजूर शिक्षकांची पदे, अतिरिक्त शिक्षक,यासारखी माहिती आॅनलाईन भरणे बंधनकारक होते. मात्र शिक्षकांनी आॅनलाईन भरली नाही. त्यामुळे केंद्रप्रमुखांना माहिती उपलब्ध झाली नाही. परिणामी तालुक्यांच्या गटशिक्षण अधिका-यांना समायोजन करणे शक्य झाले नाही. जिल्ह्यातील १ जानेवारी २०१८ नुसार पटसंख्या संकेतस्थळावर भरणे आवश्यक असून, त्यानंतरच शिक्षण विभागाकडून संच मान्यता मिळणार आहे.

शिक्षण विभागाचे वाभाडे

शिक्षण विभागाच्या कारभारावर पदाधिका-यांकडून नेहमीच नाराजी व्यक्त केली जाते. मात्र दस्तुर खुद्द ग्राविकास खात्याच्या सचिवांनीच नाराजी व्यक्त केली आहे. आदेशाचीही अंमलबजावणी शिक्षण विभागाकडून होत नसल्याने केंद्रप्रमुखांची दोन वेतनवाढी रोखण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे शिक्षण विभागातील आवमेळ चव्हाट्यावर आला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरeducationशैक्षणिक