शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नगर-पुणे रेल्वेचा मार्ग मोकळा : दिलीप गांधी यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 10:59 AM

नगरसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नगर-पुणे रेल्वे मार्गाच्या कामातील सर्व अडथळे दूर झाले असून, हे काम लवकरच मार्गी लागणार असल्याचे खासदार दिलीप गांधी यांनी सांगितले़

अहमदनगर : नगरसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नगर-पुणे रेल्वे मार्गाच्या कामातील सर्व अडथळे दूर झाले असून, हे काम लवकरच मार्गी लागणार असल्याचे खासदार दिलीप गांधी यांनी सांगितले.नगर-पुणे रेल्वेच्या कॉड लाईनचे सुरू असलेल्या कामाबाबत गांधी यांनी शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, उपजिल्हाधिकारी रमेश काळे, इंदापूरचे प्रांताधिकारी संजय अस्वले, रेल्वे बोर्डाचे प्रतिनिधी आर.एन.गुप्ता व दौंड येथील तहसीलदार आदी उपस्थित होते.नगर-पुणे रेल्वेच्या कॉड लाईनच्या कामासाठी आतापर्यंत जवळपास ९० टक्के जमिनींचे भूसंपादन झाले आहे. उर्वरित भूसंपादनासाठी ज्या शेतक-यांच्या अडचणी आणि तक्रारी होत्या त्यांच्यासमवेतही यावेळी यशस्वी चर्चा करून तोडगा काढण्यात आला. त्यामुळे आता लवकरच कॉड लाईनचे सुरु असलेले काम पूर्ण होणार असल्याचे गांधी यांनी सांगितले. रेल्वेच्या या मार्र्गामुळे नगरकरांचा पुण्याचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. दीड ते दोन तासात पुण्याला जाणे शक्य होणार असून, यामुळे वेळ व पैशाचीही बचत होणार आहे़ नगर-पुणे अशी रेल्वे सुरू झाल्यानंतर नगर-पुणे महामार्गावरील रहदारीवरही परिणाम होऊन अपघातांचे प्रमाण कमी होणार असल्याचे गांधी यांनी सांगितले.दौंडचा वळसा टळणारनगर-पुणे असा रेल्वे मार्ग नसल्याने नगरच्या प्रवाशांना दौंडमार्गे जाणा-या रेल्वेतून पुणे येथे जावे लागत होते. रेल्वेचा दौंडमार्गे हा प्रवास पाच ते सहा तासांचा होता. आता नगर- काष्टी (ता. श्रीगोंदा) - पुणे असा रेल्वे मार्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे हे काम मार्गी लागल्यानंतर नगरकरांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर