लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला सुशोभिकरणासाठी उर्वरित ४४३ कोटी ४० लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आ. संग्राम जगताप यांनी पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे गुरुवारी केली.
आ.जगताप यांनी अधिवेशनादरम्यान पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन निधीची मागणी केली. नगर शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला सुशोभिकरणाचे काम रखडलेले आहे. किल्ला सुशोभिकरणासाठी शासनाने ३१ मार्च २०१८ रोजी ४९३ कोटी ४० लाख इतक्या निधीची तरतूद केली होती. परंतु, यापैकी ५० लाख रुपये इतकाच निधी प्राप्त झाला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने प्राप्त निधीनुसार, कामांच्या निविदा प्रसिध्द केली व कामे करून घेतली. उर्वरित ४४३ कोटी ४० लाख इतर निधी उपलब्ध करून द्यावा. हा निधी उपलब्ध झाल्यास सुशोभिकरणाचे रखडलेले काम मार्गी लागेल, अशी मागणी आ. जगताप यांनी केली आहे.
...
गाळेधारकांचे भाडे कमी करण्याची मंत्री शिंदे यांच्याकडे मागणी
आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील गाळेधारकांचे भाडे कमी करण्याची मागणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. निवदेनात म्हंटले आहे, कोराना महामारीमुळे व्यावसाय बंद होते. त्यामुळे गळेधारक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या गाळ्यांमध्ये व्यावसाय करणाऱ्यांचे गाळे भाडे कमी करण्याचा आदेश प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी जगताप यांनी मंत्री शिंदे यांच्याकडे केली.