शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचं आवतन’ : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 3:38 PM

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : मुंबई ते अहमदाबाद या शासनाने सुरू केलेल्या बुलेट ट्रेनचा राज्याला फायदा नसून उलट महाराष्ट्रावर त्या खर्चाचा बोजा पडला आहे. मुख्यमंत्र्यांनी याचा विचार करायला हवा होता. शेतक-यांची कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचं आवतन आहे, ते जेवल्याशिवाय खरं नाही’, असा टोमणा मारत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी शेलक्या शब्दांत ...

ठळक मुद्देबुलेट ट्रेनचा महाराष्ट्रावर विनाकारण बोजाया प्रकल्पाचा खर्च १ लाख कोटींचा आहे. त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला ३५ लाख कोटी आले आहेत.मुख्यमंत्र्यांनी प्रारंभी संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली. नंतर त्यातील ‘संपूर्ण’ हा शब्दच निघून गेला.शिवसेना शेतक-यांसाठी रस्त्यावर उतरायचे म्हणतेय, परंतु सत्तेत बसून रस्त्यावर उतरता येत नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : मुंबई ते अहमदाबाद या शासनाने सुरू केलेल्या बुलेट ट्रेनचा राज्याला फायदा नसून उलट महाराष्ट्रावर त्या खर्चाचा बोजा पडला आहे. मुख्यमंत्र्यांनी याचा विचार करायला हवा होता. शेतक-यांची कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचं आवतन आहे, ते जेवल्याशिवाय खरं नाही’, असा टोमणा मारत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी शेलक्या शब्दांत राज्य, तसेच केंद्र शासनावर टीका केली.कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त नगरला आले असता, पवार यांनी पत्रकारांशी बोलताना शासनावर नेम धरला. मोठा गाजावाजा करून मुंबई ते अहमदाबाद ही बुलेट ट्रेन सुरू करण्यात आली. ट्रेन सुरू करण्यास विरोध नाही. परंतु या बुलेट ट्रेनचा मुंबईसह महाराष्ट्रालाही काहीच फायदा नाही. या प्रकल्पाचा खर्च १ लाख कोटींचा आहे. त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला ३५ लाख कोटी आले आहेत. अहमदाबादपर्यंत या ट्रेनचे एकूण ११ स्टेशन आहेत, त्यातील केवळ चारच महाराष्ट्राच्या हद्दीत आहेत. उर्वरित स्टेशन गुजरातच्या हद्दीत असल्याने त्याचा जास्त लाभ गुजरातलाच आहे. महाराष्ट्रावर याचा विनाकारण बोजा पडतो आहे, याचा विचार मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प स्वीकारायच्या आधी करायला हवा होता. बुलेट ट्रेन करायचीच होती तर ती मुंबई-दिल्ली अशी करायची होती. मग त्याचा बºयाच राज्यांना फायदा झाला असता. महाराष्ट्रात करायची होती तर चंद्रपूर-पुणे-मुंबई अशी करायची, मग त्याचा राज्याला लाभ झाला असता, असे मुद्दे अधोरेखित करत शरद पवार यांनी बुलेट ट्रेनबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय चुकल्याचे सांगितले.मुख्यमंत्र्यांनी प्रारंभी संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली. हळूहळू त्यात बदल होत गेले, नंतर तर त्यातील ‘संपूर्ण’ हा शब्दच निघून गेला. त्यामुळे शेतक-यांची कर्जमाफी म्हणजे लबाडाघरचं आवतन आहे, ते जेवल्याशिवाय खरं नाही. आता पाहू कधी जेवायला मिळतंय ते, असा टोमणा पवार यांनी कर्जमाफीच्या मुद्यावर सरकारला मारला.शिवसेना शेतक-यांसाठी रस्त्यावर उतरायचे म्हणतेय, त्याचे आम्ही स्वागत करतो, परंतु सत्तेत बसून रस्त्यावर उतरता येत नाही, त्यासाठी आधी बाहेर पडा, मग आमच्यासारखे रस्त्यावर या, असे म्हणत पवार यांनी शिवसेनेलाही पट्ट्यात घेतले. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, अंकुश काकडे, आ. अरूण जगताप, संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले आदी उपस्थित होते.