शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

परतीच्या पावसाने कपाशी, तूर पाण्यात; बाजरीचे झाले भुसकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 12:30 PM

यंदा शेतक-यांनी दुष्काळावर मात करीत खरिपाची पिके घेतली. मात्र गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतातील पिके बरबाद झाली.

लोकमत बांधावर/ संजय सुपेकर । बोधेगाव : यंदा शेतक-यांनी दुष्काळावर मात करीत खरिपाची पिके घेतली. मात्र गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतातील पिके बरबाद झाली. शेतात उसनवारी करून केलेला खर्च वाया गेल्याने शेतकरी पूर्णपणे खचला आहे. अशा अस्मानी संकटामुळे यंदा शेतक-यांची अवस्था ‘घर जाळून कोळशाचे धंदे’ अशी झाल्याचे विदारक चित्र आहे. बोधेगावसह (ता.शेवगाव) परिसरातील बालमटाकळी, लाडजळगाव, चापडगाव, चेडेचांदगाव, सोनविहीर, हातगाव, मुंगी, गदेवाडी, ठाकुर पिंपळगाव आदींसह तालुक्यातील बहुतांशी गावात अतिवृष्टीमुळे पिके मातीमोल झाली आहेत. बोधेगाव येथील ‘लोकमत’ प्रतिनिधीने  बोधेगाव, चेडे चांदगाव तसेच लाडजळगाव याठिकाणी भेट देऊन पिकांची पाहणी केली. त्यावेळी पिकांची अतिशय विदारक अवस्था झालेली दिसून आली. बोधेगाव येथील बंकट कणसे, इसाक शेख यांच्या शेतातील कपाशी आजही गुडघाभर पाण्यात तरंगत आहे. तर नामदेव गर्जे यांची चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्चून हातातोंडाशी आलेली एकरभर मका जास्त पावसामुळे पूर्णपणे जळून गेली आहे. अभय चव्हाण यांच्या सोंगणी केलेल्या बाजरीचे भिजल्याने कुजून भुसकट झाले आहे. लाडजळगाव येथील महादेव पाटील या वयस्कर शेतक-याचे दीड हेक्टर कपाशी पीक पाण्यात गेले आहे. तर बाजरीला क-हे फुटले आहेत. चेडेचांदगाव येथील संदीप चेडे यांच्या शेतातील वेचणीला आलेल्या कापसाला कोंब फुटले असल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशीच परिस्थिती परिसरातील अनेकांच्या शेतात झाली असल्याचे गोवर्धन ढेसले, मयूर हुंडेकरी, ज्ञानदेव घोरतळे, सुनील गर्जे, राजेंद्र घोरतळे, बाबासाहेब तांबे यांनी सांगितले. गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून थेट बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. आजपर्यंत तालुक्यातील एकूण ५० हजार ४०४ हेक्टरपैकी ६ हजार २०० हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे आठ दिवसात पूर्ण होतील. तालुक्यात सर्वाधिक बाजरी व त्या खालोखाल कपाशी पिकांचे अतोनात नुकसान झालेले आढळून येत आहे, असे शेवगाव तालुका कृषी अधिकारी किरण मोरे यांनी सांगितले.   

टॅग्स :ShevgaonशेवगावCrop Insuranceपीक विमा