शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

कोरोनाने पुसले शेकडो महिलांच्या कपाळावरील कुंकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:28 AM

अहमदनगर : कोरोना महामारीने अनेक संकटे निर्माण केली. जिल्ह्यातील शेकडो महिलांच्या कपाळावरील कुंकू या महामारीने पुसले गेले. आता ही ...

अहमदनगर : कोरोना महामारीने अनेक संकटे निर्माण केली. जिल्ह्यातील शेकडो महिलांच्या कपाळावरील कुंकू या महामारीने पुसले गेले. आता ही कुटुंबे सावरण्यासाठी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून दिलासा देण्यात येत आहे.

कोरोनामुळे जिल्ह्यातील अडीच हजारांपेक्षा जास्त पुरुषांना, तर दीड हजारांपेक्षा जास्त महिलांना जीव गमवावा लागला. अडीच हजार मृत्यूंमध्ये घराची जबाबदारी असणाऱ्या कर्त्या पुरुषांची संख्या मोठी होती. घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर बहुतांशवेळा कुटुंबाची जबाबदारी ही त्याच्या पत्नीवर येऊन पडते. सध्याच्या परिस्थितीमध्ये तत्काळ नोकरी किंवा कुठला व्यवसाय मिळणे कठीण आहे. या परिस्थितीमध्ये महसूल विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजना, नॅशनल फॅमिली बेनिफिट स्कीम या योजनांमध्ये अशा महिलांची नावे घेऊन त्यांना पेन्शन सुरू करण्यात येते.

-----------

असा करा अर्ज

जिल्हा महिला, बालविकास विभागाकडून जिल्ह्यातील अशा कुटुंबांचा सर्व्हे करण्यात येत आहे. त्याचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्यात येणार आहे. महिला बालविकास विभागाचे कर्मचारी, अधिकारी गावोगावी जाऊन याची माहिती घेत आहेत. या योजनेपासून कोणी वंचित राहू नये, या उद्देशाने घरातील कर्ता पुरुष कोरोनामुळे गेला असल्यास त्याची माहिती महिला बाल विकास विभागाला द्यावी. तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

-----------

जिल्ह्यातील एकूण बाधित :

बरे झालेले रुग्ण :

उपचार सुरू असलेले रुग्ण :

पुरुषांचा मृत्यू- २५०० पेक्षा जास्त

महिलांचा मृत्यू- १५०० पेक्षा जास्त

निराधार महिला- ५०० पेक्षा जास्त

------------

१) कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये ३००० पेक्षा जास्त पुरुष रुग्णांना जीव गमवावा लागला

२) घरातील कर्त्या पुरुषाच्या पाठीमागे राहिलेल्या कुटुंबाला सावरताना महिलांची होरपळ होत आहे

३) अनेक महिलांच्या घरामध्ये सासरे, सासू तसेच लहान मुले देखील असल्याने या महिलांना मोलमजुरी करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

४) शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या महिलांना आपल्या पायावर उभे राहता येऊ शकते, किमान कुटुंब सावरण्यासाठी कुटुंब आहे, त्यांची भूक भागवण्यासाठी शासनाकडून निधी मिळणार आहे.

--------

कोरोना महामारीमुळे शेकडो महिलांना कुटुंब सावरण्यासाठी धडपड करावी लागत आहे. ज्या महिलेचा पती कोरोनामुळे गेला, अशा महिलांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. शासनाच्या संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी आदी योजनांच्या माध्यमातून अशा महिलांना मदत देण्यात येत आहे.

- महिला व बालविकास कार्यालय

---------