शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

सहकाराचा स्वाहाकार : कर्जबुडव्यांमुळे एनपीए वाढला

By मिलिंदकुमार साळवे | Published: January 03, 2019 11:03 AM

वैद्यक व्यावसायिकांच्या कोट्यवधी रूपयांच्या कर्ज प्रकरणांमुळे चर्चेत आलेल्या अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या संशयित बुडित कर्जाच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : वैद्यक व्यावसायिकांच्या कोट्यवधी रूपयांच्या कर्ज प्रकरणांमुळे चर्चेत आलेल्या अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या संशयित बुडित कर्जाच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे.बँकेच्या सन २०१७-१८ च्या ४७ व्या वार्षिक अहवालातून ही बाब समोर आली आहे. कर्ज बुडवेगिरी करणाऱ्या थकबाकीदारांचे प्रमाण वाढल्यामुळे बँकेला अनुत्पादक कर्जासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रूपयांची तरतूद (एन. पी. ए.) करावी लागत आहे. बँकेला ३१ मार्च २०१८ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात ५ कोटी ५२ लाख ४९ हजार रूपयांचा नफा झाल्याचे ताळेबंदात दाखविण्यात आले आहे. सन २०१६-१७ मध्ये ५ कोटी ४६ लाख २५ हजार रूपयांचा नफा झाला होता. त्या तुलनेत नफा ६ लाखांनी वाढल्याचे दिसते.मात्र, सन २०१५-१६ मध्ये ६ कोटी ५५लाख ९५ हजार रूपये सर्वाधिक नफा झाला होता. या नफ्याच्या तुलनेत दोन वर्षातच १ कोटी ३ लाख रूपयांची घसरण झाली आहे. यामागेही गेल्या दोन वर्षात कर्ज थकबाकीचे प्रमाण वाढले, हे एक महत्त्वाचे कारण दिसते.बँकेचा आर्थिक ताळेबंद सावरण्यासाठी अनुत्पादक कर्जापोटी कराव्या लागणाºया एन. पी. ए. तरतुदीमध्येही वाढ करावी लागत आहे. सन १५-१६ मध्ये ९ कोटी १२ लाख रूपयांची एन. पी. ए. तरतूद करावी लागली होती. १६-१७ मध्ये या तरतुदीत दुपटीने वाढ होऊन ती १५ कोटी ५२ लाख करावी लागली. सन २०१७-१८ मध्ये ती ३० कोटी ८९ लाख रूपये करावी लागली. ही तरतूद अनुत्पादक कर्जांसाठी करावी लागते. एनपीए वाढणे हे आर्थिक गैरशिस्तीचे लक्षण मानले जाते.काही वैद्यक व्यावसायिकांना दिलेल्या संशयास्पद कर्जांमुळे निवडक पाच ते सहा प्रकरणांमध्येच बँकेचे मोठे कर्ज अडकून पडले. त्यामुळे बँकेच्या कर्ज थकबाकीत प्रचंड वाढ झाली. बँकेने कर्ज वसुलीसाठी महाराष्टÑ राज्य सहकार कायदा १९६० चे कलम ९१, सिक्युरिटायझेशन अ‍ॅक्ट २००२ अंतर्गत कर्जदार व जामीनदार यांच्याविरूद्ध कारवाई सुरु केलेली आहे.बँकेने कर्ज वसुलीसाठी थकीत कर्जदार व त्यांचे जामीनदार यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई केल्यामुळे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात वसुलीत वाढ होऊन थकीत कर्जाचे प्रमाण कमी होईल, अशी संचालक मंडळास खात्री आहे.बँकेची स्थिती मजबूतवैद्यकीय व्यावसायिकांच्या थकबाकीमुळे शहर बँकेच्या एनपीएचे प्रमाण वाढले असले तरी बँकेच्या आर्थिक स्थितीला त्यामुळे काही धक्का पोहचणार नाही. बँकेच्या ठेवी सुरक्षित असून बँकही नफ्यात आहे. थकीत कर्जांपोटी बँकेकडे मालमत्ताही तारण आहेत. निलेश शेळके व इतर प्रकरणात तारण मालमत्तांमधून कर्जाची वसुली होणार आहे. ठेवीदारांचे यात काहीही नुकसान होणार नाही. वसुलीची प्रक्रिया सुरु आहे. - संतोष अनासपुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, शहर सहकारी बँ

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर