शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
3
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
4
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
5
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
6
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
7
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
8
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
9
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
10
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
11
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
12
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
13
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
14
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
15
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
16
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
17
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
18
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
19
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
20
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

विजेच्या धक्क्याने महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू;  महावितरणचा हलगर्जीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 1:42 PM

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे सारोळा सोमवंशी येथील एका महाविद्यालयीन तरुणाचा रविवारी (दि.३) सायंकाळी सातच्या सुमारास विजेच्या धक्क्याने निधन झाले.

विसापूर : महावितरणच्या हलगर्जीपणामुळे सारोळा सोमवंशी (ता. श्रीगोंदा) येथील एका महाविद्यालयीन तरुणाचा रविवारी (दि.३) सायंकाळी सातच्या सुमारास विजेच्या धक्क्याने निधन झाले. तो विसापूर येथील सरस्वती विद्यालयात अकरावीच्या शास्त्र शाखेत शिक्षण घेत होता. संदेश अनिल आढाव (वय १६, रा. सारोळा सोमवंशी) असे त्याचे नाव आहे. सारोळा सोमवंशी येथे नवलेवस्तीजवळ पंधरा दिवसांपासून एक वीज वाहक खांब जमिनीवर पडलेला होता. तरीही त्यातून विद्युत प्रवाह चालू होता. याची माहिती ग्रामस्थांनी महावितरणच्या कर्मचाºयांना वारंवार दिली होती. तरीही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. रविवारी सायंकाळी संदेश जनावरांना चारा घेऊन येत असताना चिखलात पाय घसरून विजेच्या तारेवर पडला. जमिनीवर पडलेल्या तारेला विद्युत प्रवाह चालू असल्याने विजेच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्याबरोबर त्याची बहीण व आई होती. त्याच्या बहीणीने त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला. तिलाही विजेचा किरकोळ धक्का बसला. त्यांच्या आईने जवळ असलेल्या कपड्याच्या सहाय्याने त्यांना बाजूला केले. मात्र त्याचा मृत्यू झाला.

दहा-बारा दिवसांपूर्वी सारोळा सोमवंशी येथे नवलेवस्ती जवळ पावसामुळे विजेचा खांब, तारा जमिनीवर पडल्या आहेत. ज्या ठिकाणी तारा पडल्या त्या ठिकाणी पावसामुळे मजूरांना जाणे शक्य नव्हते. त्यामुळे ते दुरुस्तीचे काम करता आले नाही. मात्र त्या ठिकाणचा विद्युत प्रवाह तत्काळ खंडित करण्यात आला होता. मात्र रविवारी अचानक कोणत्यातरी अज्ञात व्यक्तीने वीज प्रवाह जोडला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती वरिष्ठांना कळविली आहे, असे कोळगाव येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता दीपक सिंग यांनी सांगितले. 

टॅग्स :Shrigondaश्रीगोंदाmahavitaranमहावितरण