शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

महालावर स्वच्छता... गावात कचरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 10:42 AM

आपल्या भागातील पर्यटनस्थळे स्वच्छ असली पाहिजेत. पर्यटनस्थळावर कचरा होणार नाही, यासाठी प्रशासनाकडूनही उपाययोजना केल्या पाहिजेत.

सुदाम देशमुखअहमदनगर : आपल्या भागातील पर्यटनस्थळे स्वच्छ असली पाहिजेत. पर्यटनस्थळावर कचरा होणार नाही, यासाठी प्रशासनाकडूनही उपाययोजना केल्या पाहिजेत. जागोजागी कचरा कुंड्या ठेवल्या पाहिजेत. मात्र तसे न झाल्याने पर्यटक कुठेही कचरा टाकतात. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे वेष्टन फेकली जातात. त्यामुळे पर्यटनस्थळांचा परिसर गलिच्छ बनतो. त्यामुळे काही सामाजिक संघटना, तरुणांचे जथ्थे दर रविवारी महाल परिसरात जातात आणि स्वच्छतेची मोहीम घेतात. हे त्यांचे काम स्तुत्यच आहे. महालावरील स्वच्छता पटकन होते. सुका कचरा पटकन पोत्यात भरला की स्वच्छता मोहीम फत्ते होते. सोशल मीडियावर त्याचे फोटो व्हायरल होतात. त्याला वाहवाही मिळते. हे काम अतिशय चांगले आहे. मात्र महालाचा परिसर स्वच्छ करीत असताना गावातील स्वच्छतेचे कोण पाहणार? एखाद्या तरुणाच्या गल्लीत कचरा साठलेला असतो. मात्र तो गल्लीतला कचरा उचलण्याऐवजी तो थेट महालावरचा कचरा गोळा करतो. महाल परिसरात कचरा होणार नाही ही जशी काळजी घेतली जाते, तशी गल्लीत कचरा झाला नाही पाहिजे, याची काळजी कोणीच घेताना दिसत नाही. शहरातील कचरा साफ झाला पाहिजे, याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. ही महापालिकेची जेवढी जबाबदारी आहे, तेवढीच नागरिकांची देखील आहे.सामाजिक संस्था, तरुणांचे ग्रुप आणि इतर स्वच्छता प्रेमींनी नगरमध्येही स्वच्छता करावी. अगदी शाळांच्याभोवती कचरा कुंड्या ओसंडून वाहतात. आपण राहतो, अशा ठिकाणी कचरा अस्ताव्यस्त पडलेला असतो. कुंड्यांच्याबाहेर कचरा पडलेला असतो. लोक कचरा गाडीवरूनच फेकतात. कुंडीजवळ येतात आणि कुंडीत टाकण्याऐवजी कुंडीच्याबाहेर कचरा फेकला जातो. तो कचरा रस्त्यावर येतो. त्यामुळे एक पाऊल पुढे जाऊनच लोकांनी कचरा फेकला पाहिजे. नाल्यातही प्लास्टिकच्या पिशव्यांमधून कचरा फेकला जातो. त्यामुळे नाल्या तुंबल्या जातात.महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचाही कारभार ढिसाळ आहे. नियोजन, व्यवस्थापनाअभावी कचरा जागेवरच पडून असतो. आता दोनवेळा साफसफाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मात्र तो कायमस्वरुपी टिकण्याची शक्यता अजिबात वाटत नाही. त्यालाही कामगार युनियनकडून नेहमीच विरोध केला जातो. कचरा संकलनासाठी अपुरी साधन-सामुग्रीची नेहमीच चर्चा झडते. स्वच्छतेसाठी १४ व्या वित्त आयोगातून मिळालेला निधी तसाच पडून असतो, ही एक शोकांतिकाच! शेवटी शहर स्वच्छ झाले पाहिजे, ही ओढ महत्त्वाची आहे. त्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे आले तरच शहर स्वच्छ होईल. केवळ स्वच्छतेच्या स्पर्धेत क्रमांक मिळवून गल्लीतले कचऱ्याचे ढीग कमी होणार नाहीत. केवळ कागदावर स्वच्छता असून उपयोग नाही, हेही थोडे महापालिकेने लक्षात घेतले पाहिजे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर