शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
2
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
3
मिचेल स्टार्कचा भेदक मारा, राहुल त्रिपाठी लढला! KKR समोर SRH २० षटकंही नाही टिकला
4
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
5
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
6
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
7
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
8
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
9
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
10
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
11
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
12
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
13
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
14
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

केंद्राची लस संपली, राज्याकडून दहा हजार डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 4:22 AM

अहमदनगर : राज्य सरकारकडून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी दहा डोस प्राप्त झाले असून, ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांसाठी ...

अहमदनगर : राज्य सरकारकडून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी दहा डोस प्राप्त झाले असून, ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांसाठी दिली जाणारी लस गुरुवारी संपली. त्यामुळे सध्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाच फक्त कोरोनावरील लस देण्यात येत आहे.

कोरोनावरील लस ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांना देण्यात येत होती. राज्य सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्याचा निर्णय जाहीर केला असून, त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी महापालिकेला १ मे रोजी १० हजार डोस वितरीत केले आहेत. महापालिकेच्या सहा आरोग्य केंद्रांमध्ये ही लस दिली जात आहे. परंतु, ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांना देण्यासाठी महापालिकेकडे लस शिल्लक नाही. लसीचा तुटवडा असल्याने महापालिकेने ४५ ते ६० या वयोगटातील नागरिकांना पहिला डोस देणे बंद केले असून, या वयोगटातील नागरिकांना फक्त दुसरा डोस दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांचाही गोंधळ उडाला असून, लस घेण्यासाठी नागरिक केंद्राबाहेर रांगा लावत आहेत. परंतु, लस शिल्लक नसल्याने पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांना लस दिली जात नाही. केंद्र सरकारकडून लस प्राप्त झाल्यानंतर ४५ वर्षांपुढील नागरिकांना पहिला व दुसरा डोस दिला जाईल. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांना लस येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

...

... असे झाले लसीकरण

एकूण लसीकरण- ६१,७८५

१८ ते ४४ वयोगट- ८,८२६

...

४५ वर्षांपुढील - १४,१२५

.....

दररोज ३०० डोस

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना महापालिकेच्या सहा आरोग्य केंद्रांवर लस दिली जात असून, या केंद्रांना दररोज ३०० डोस वितरीत करण्यात येतात. परंतु, ते दुपारपर्यंत संपतात. त्यामुळे नागरिकांचा गोंधळ उडत आहे.