शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

शिवसैनिकांच्या हत्याकांडात भाजपा नेत्यांचाही हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 5:02 AM

भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी संगनमताने केडगाव येथील शिवसैनिकांची हत्या केल्याचा गंभीर आरोप करत या हत्येची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावी, अशी मागणी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी रविवारी नगर येथे केली़

अहमदनगर : भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी संगनमताने केडगाव येथील शिवसैनिकांची हत्या केल्याचा गंभीर आरोप करत या हत्येची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावी, अशी मागणी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी रविवारी नगर येथे केली़ त्याचबरोबर या प्रकरणातील आरोपींना फाशी व्हावी, यासाठी सेना पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले़महापालिका पोटनिवडणुकीच्या वादातून शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची शनिवारी हत्या झाली. या घटनेने विभागात एकच खळबळ उडाली़ पोटनिवडणुकीत अशा प्रकारे हिंसाचार होणे व त्यात कार्यकर्त्याचा मृत्यू होणे ही बाब गंभीर असल्याचे मत सर्वत्र व्यक्त होत आहे़ त्यात या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री दिवाकर रावते व मंत्री कदम रविवारी नगरमध्ये आले होते़ शिवसैनिकांच्या हत्याकांडाला कदम यांनी पोलीस यंत्रणेला जबाबदार धरले़ ते म्हणाले, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना अटक झाल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला झाला़ त्यानंतर कार्यकर्ते जगताप यांना घेऊन गेले़ यावरून नगर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची कल्पना येते़ कार्यालयावर हल्ला करणाºयांना मोक्का लावण्याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे कदम म्हणाले़पोलिसांच्या मदतीने नगर शहरात गुंडगिरी वाढली असून, यातूनच शिवसैनिकांची हत्या झाली आहे़ या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक करावी़ कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पोलीस प्रशासनाला सूचना करण्यात आल्या आहेत़ मयतांच्या कुटुंबीयांची जबाबदारी शिवसेना स्वीकारत असल्याचे कदम यांनी जाहीर केले़>भाजपाला शिवसेनेचा टेकूगृहराज्यमंत्रिपद सेनेकडे असल्याचे पत्रकारांनी छेडले असता, गृहराज्यमंत्र्यांना काय अधिकार असतात ते सर्वांनाच माहिती आहे़ सेना सत्तेत सहभागी नसून, सेनेने फक्त टेकू दिलेला आहे़ गृहमंत्रिपद मुख्यमंत्र्यांकडे आहे़ राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे़ त्यास मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत़ या घटनेचा अहवाल पक्षप्रमुखांना दिला जाईल, त्यावर ते योग्य तो निर्णय घेतील, असेही कदम म्हणाले़>राष्ट्रवादीला बदनामकरण्याचे षड्यंत्र - पवारकोणते ना कोणते कारण शोधून राष्ट्रवादी पक्षाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. अहमदनगरमध्ये शिवेसनेच्या दोन कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ज्याने हत्या केली. तो स्वत: पोलीस ठाण्यात हजर राहून गुन्ह्यांची कबुली देतोय. आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडल्याचे त्याने सांगितले असताना राष्ट्रवादीच्या आमदारांना अटक कशी होते? हेन उलगडणारे कोडे आहे, असे सातारा येथे राष्टÑवादीच्या हल्लाबोल सभेत अजित पवार यांनी सांगितले.