शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

दुकानातली मिठाई खात आहात सावधान; नगरमध्ये होतंय नियमांचे उल्लंघन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 3:03 PM

मिठाई विक्रीच्या दुकानांत सुट्या मिठाईसमोर बेस्ट बिफोरची सूचना (किती दिवसांत खावी) आणि पॅकबंद मिठाई पॅकिंगवर 'एक्सपायरी डेट' लिहिने बंधनकारक असतानाही नगर शहरातील बहुसंख्य विक्रेते या नियमाचे सर्रास उल्लंघन करताना आढळून आले आहेत. अन्न, औषध प्रशासनाचेही याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

अहमदनगर : मिठाई विक्रीच्या दुकानांत सुट्या मिठाईसमोर बेस्ट बिफोरची सूचना (किती दिवसांत खावी) आणि पॅकबंद मिठाई पॅकिंगवर 'एक्सपायरी डेट' लिहिने बंधनकारक असतानाही नगर शहरातील बहुसंख्य विक्रेते या नियमाचे सर्रास उल्लंघन करताना आढळून आले आहेत. अन्न, औषध प्रशासनाचेही याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

दसरा आणि दिवाळीनिमित्त मिठाई खरेदीसाठी सध्या ग्राहकांची दुकानांत मोठी गर्दी होत आहे. दुकानांमध्ये ठेवलेली विविध आकारातील आणि आकर्षक पॅकिंगमधील मिठाई ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रत्यक्षात मात्र ही मिठाई कधी तयार झालेली आहे आणि ती किती दिवसापर्यंत खावी याचा कुठेच उल्लेख नसतो. नगर शहरातील बहुतांशी मिठाई दुकानदार स्थानिक ठिकाणीच मिठाई तयार करून त्याचे पॅकिंग करतात. पेढा, श्रीखंड, आम्रखंड, बटर, गुलाब जामून, रबडी, लाडू, काजू कतली अशी विविध प्रकारातील मिठाईचे पॅकिंग करून विकली जात आहे. पॅकिंग डब्बा अथवा बॉक्सवर मात्र हा पदार्थ किती दिवसापर्यंत खाता येईल याचा उल्लेख नसल्याचे 'लोकमत'ने रविवारी (दि.२५ आॅक्टोबर) केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. 

कोणतीही मिठाई तयार केल्यानंतर विशिष्ट कालावधीतच ती खाता येते.  खराब झालेले अन्न पदार्थ खाल्ल्याने विषबाधा झाल्याच्या अनेक घटना नगर जिल्ह्यात समोर आल्या आहेत. पैसे कमाईसाठी मिठाई विक्रेते मात्र नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. दसरा व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांची विक्री करणाºया दुकानाची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे अन्न व औषध प्रशासन सांगत आहे. प्रत्यक्षात मात्र नगर शहरात व जिल्ह्यात मिठाई व इतर अन्नपदार्थांची विक्री करणाºया दुकानदारांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे.नामांकित कंपन्यांच्या मिठाईची दुकानदारांना एलर्जी

बाजारात विविध नामांकित कंपन्यांच्या पॅकबंद स्वरूपातील मिठाई व इतर अन्नपदार्थ उपलब्ध आहेत. या पॅकिंगवर पदार्थ तयार झाल्याची तारीख व किती दिवस वापरता येईल याचा उल्लेख असतो. कंपनीचे नाव पत्ता व संपर्क क्रमांकही दिलेला असतो. नगर शहरातील बहुतांशी मिठाई विक्रेते मात्र या नामांकित कंपनीचा माल न ठेवता स्वत: तयार केलेला माल अणि तोही नियमांचे उल्लंघन करून विकत असल्याचे आढळून आले आहे.ग्राहकांनी बिल अवश्य घ्यावेबहुतांश ग्राहक दुकानातून मिठाई खरेदी केली की बिल घेत नाहीत. दुकानदारही स्वत:हून बिल देत नाहीत. मिठाई खराब निघाली तर दुकानदार जबाबदारी झटकतात. अशावेळी ग्राहकांकडेही काहीच पुरावा राहत नाही. त्यामुळे ग्राहकांनी मिठाईसह कोणताही अन्नपदार्थ खरेदी केल्यानंतर दुकानदाराकडून पक्के बिल घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग