शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

कांद्याला निर्यात बंदी आणणे, हा तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी केलेला द्रोह आहे- लहू कानडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 1:13 PM

अहमदनगर: काही महत्त्वाच्या शेती उत्पादनाला अत्यावश्यक यादीतून वगळणे, आणि आता कांद्याला निर्यात बंदी आणणे, हा तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी केलेला द्रोह आहे,' अशी घणाघाती टीका करतानाच आमदार लहू कानडे यांनी केंद्र सरकारचा समाचार घेतला. 'केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी अधिकच संकटात जाईल. त्यामुळे केंद्र सरकारने निर्यातबंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार करून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी आमची मागणी आहे. ही मागणी मान्य न झाल्यास आम्ही शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरू, असा इशाराही यावेळी कानडे यांनी दिला.

अहमदनगर: काही महत्त्वाच्या शेती उत्पादनाला अत्यावश्यक यादीतून वगळणे, आणि आता कांद्याला निर्यात बंदी आणणे, हा तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी केलेला द्रोह आहे,' अशी घणाघाती टीका करतानाच आमदार लहू कानडे यांनी केंद्र सरकारचा समाचार घेतला. 'केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी अधिकच संकटात जाईल. त्यामुळे केंद्र सरकारने निर्यातबंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार करून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी आमची मागणी आहे. ही मागणी मान्य न झाल्यास आम्ही शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरू, असा इशाराही यावेळी कानडे यांनी दिला.

कांदा निर्यात बंदीचा केंद्र सरकारने निर्णय घेतल्यामुळे या निर्णयाचा विरोध करण्यासाठी आज काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. नगरमध्येही काँग्रेसच्या वतीने आपल्या मागण्यांचे निवेदन आमदार लहू कानडे, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे आदींनी जिल्हा प्रशासनाला दिले. 

यावेळी आमदार कानडे यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याबाबत वक्तव्य केले आहे. ते म्हणाले,'आपला देश हा श्रद्धाळू लोकांचा देश आहे. त्यामुळे मंदिर खुली केली तर गर्दी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कोविडची रुग्णसंख्या वाढत आहे. सध्या समूह संसर्ग सुरू झाला आहे. अशा काळात मंदिरे खुली करून पुन्हा लोकांना मृत्यूच्या खाईत लोटणे योग्य होणार नाही. त्यामुळे श्रद्धाळूनी श्रद्धा घरातल्या घरात व्यक्त करावी, असे माझ्यासारख्याला वाटते. आम्ही देखील श्रद्धाळू आहोत. पण आपल्याला हा निर्णय घेण्यासाठी थोडा संयम ठेवण्याची गरज आहे. करोनासंसर्ग जेव्हा कमी होईल, हळूहळू रुग्ण संख्या कमी होत जाईल, परिस्थिती आटोक्यात येईल, तेव्हा या सर्व गोष्टी खुल्या होणारच आहेत,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यात यावी, यासाठी भाजपसह विविध पक्ष, संघटना यांच्याकडून मागणी करण्यात येत असून यासाठी भाजपने राज्यभर आंदोलने केली. मात्र, अद्याप धार्मिक स्थळे उघडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यातच काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी मंदिर उघडण्याबाबत अद्याप संयम बाळगण्याची गरज असल्याचे स्पष्ट करतानाच या निर्णयाला वेळ लागणार असल्याचे संकेत दिले आहेत.

 

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे काही तालुके, शहर स्वतःहून लॉकडाऊन करण्याचा निर्णय तेथील नागरिक घेऊ लागले आहे. आमदार कानडे प्रतिनिधित्व करीत असलेल्या मतदारसंघातील श्रीरामपूर शहर हद्दीमध्ये ही सध्या जनता कर्फ्यू सुरू आहे. याबाबत कानडे यांना विचारले असता ते म्हणाले, 'लोक स्वतःहून बंद करीत असतील तर आम्हाला त्याबाबत काही म्हणायचे नाही. पण बंदची बळजबरी करू नये. कारण मोदी सरकारच्या लॉकडाऊन मुळे अर्थव्यवस्थेचे अगोदरच तीन तेरा वाजले आहेत. जीडीपी हा इतिहासात पहिल्यांदा एवढा खाली आला आहे. त्याचं कारण म्हणजे मोदी सरकारने घाईघाईने केलेला लॉकडाऊन आहे. आता आपली जबाबदारी ही अर्थव्यवस्था रुळावर आणणे ही आहे. सरकारने अनलॉक सुरू केले. त्यामुळे हळूहळू हातावर पोट असणारी माणसे पुन्हा रुळावर येताना दिसत आहे. पुन्हा लॉकडाऊन केला तर या माणसांच्या अडचणीत भर पडेल. त्यामुळे उद्योग धंदे चालू राहणे गरजेचे आहे. कारण हातावर पोट असणाऱ्या माणसांना जगता आले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे बंदबाबत कोणतीही जबरदस्ती करू नये,' असेही ते म्हणाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरonionकांदा