शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शेतक-यांना दीडपट हमीभावाचे केंद्राचे आश्वासन - अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 4:45 PM

राळेगणसिध्दीत अण्णांचे जल्लोषात स्वागत

राळेगणसिद्धी : शेतक-यांना दीड पट हमी भाव देण्याचे लेखी आश्वासन पंतप्रधान कार्यालयाच्या मंत्र्यांनी दिले आहे. शेतमालाला हमीभाव मिळाला तर त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागतील. पुढील काळात शेतक-यांच्या आत्महत्या थांबण्यास मदत होईल, असा आशावाद ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला.नवीदिल्ली येथे रामलिला मैदानावर सात दिवसांच्या उपोषणाच्या सांगतेनंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे शनिवारी (दि.३१) राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने जल्लोषात त्यांचे स्वागत केले. यावेळी अण्णांनी संत यादवबाबा यांचे दर्शन घेतले. त्यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना अण्णा हजारे बोलत होते.राळेगणसिद्धीकडे येताना पुणे विमानतळ, वाघोली, रांजणगाव गणपती, वाडेगव्हाण येथेही नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. सरपंच रोहिणी गाजरे, माजी सरपंच मंगल मापारी, सीमा औटी, कौशल्या हजारे, शैला भालेकर, रेखा पठारे, रेखा औटी, हिराबाई पोटे, निर्मला आवारी या महिलांनी अण्णांचे औंक्षण केले. हजारे पुढे म्हणाले, रामलीला मैदानावरील आंदोलनाला पाठिंबा म्हणून राळेगणसिद्धी परिवाराने सात दिवस वेगवेगळे उपक्रम राबवून साथ दिली. त्यामुळे मला आंदोलनासाठी मोठी उर्जा मिळाली. एका गावाची ताकद काय असते, हे राळेगणसिद्धीने भारत सरकारला दाखवून दिले. शेतात राबराब राबणा-या शेतक-यांच्या पिकाला मोबदला मिळत नसल्याने आत्महत्या वाढल्या. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळाला तर या आत्महत्या थांबतील. दुधालाही चांगला भाव मिळायला हवा, असे ते म्हणाले. हजारे यांनी दिवसभर संत यादवबाबा मंदिरात विश्रांती घेतली. सायंकाळी ग्रामसभेत विजयोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे उपसरपंच लाभेष औटी यांनी सांगीतले. यावेळी माजी सरपंच जयसिंग मापारी, आदर्श पतसंस्थेचे संचालक रमेश औटी, विलास औटी, गणपत पठारे, सुरेश पठारे, दादा पठारे, डॉ. धनंजय पोटे, शरद मापारी, दत्ता आवारी, दादाभाऊ गाजरे, प्राचार्य सोमनाथ वाकचौरे, सुभाष पठारे, अरुण भालेकर, महेंद्र गायकवाड, नाना लंके, गणेश आवारी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेParnerपारनेरAhmednagarअहमदनगर