शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

समन्वय समितीच्या बैठकीत अण्णांच्या आंदोलनाची रणनीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:37 PM

लोकपाल, शेतक-यांचे प्रश्न व निवडणूक सुधारणा आदी मागण्यांबाबत नवी दिल्ली येथे २३ मार्चपासून सुरू होणा-या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सत्याग्रह आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी राष्ट्रीय समन्वय समितीची पहिली बैठक शनिवारी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात पार पडली

राळेगणसिद्धी : लोकपाल, शेतक-यांचे प्रश्न व निवडणूक सुधारणा आदी मागण्यांबाबत नवी दिल्ली येथे २३ मार्चपासून सुरू होणा-या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सत्याग्रह आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी राष्ट्रीय समन्वय समितीची पहिली बैठक शनिवारी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात पार पडली. आंदोलनाची तयारी गतिमान करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.बैठकीत मार्गदर्शन करताना अण्णा म्हणाले, माझे जीवन आता जास्त नाही. जे जीवन मी जगत आहे, ते बोनस असून जोपर्यंत प्राण आहे, तोपर्यंत समाज व देशासाठी जीवन जगण्याचा माझा निर्धार आहे. भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन संघटनेसाठी चारित्र्यशील लोकांचे संघटन आवश्यक आहे. भविष्यात आंदोलन कायमस्वरूपी राहण्यासाठी राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर चारित्र्यशील लोकांचे संघटन तयार झाले तर कोणतेही सरकार असो नाक दाबले की त्यांचे तोंड उघडेल. सरकारवर एक दबाव गट असायला हवा. आंदोलन चारित्र्यावर आधारित हवे. फक्त गर्दी जमवून काही होणार नाही. कार्यकर्त्यांनी ध्येयवादी असायला हवे. समन्वय समितीच्या सदस्यांनी आपापल्या राज्यात, जिल्हा व तालुक्यात भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या शाखा तयार कराव्यात. परंतु, आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करणे गरजेचे आहे. आंदोलनासाठी दानशूर व्यक्तींकडून मदत घ्या. परंतु, ती रोख स्वरूपात नको.नवी दिल्लीतील आंदोलनासाठी कर्नल नैन, कमांडर यशवंत, मनिंद्र जैन यांनी आंदोलनाची जागा व प्रशासकीय बाबींची, प्रचार-प्रसार मटेरिअल डिझायनिंगची जबाबदारी सुनील लाल, आंदोलकांसाठी भोजन व्यवस्था करनवीर व सुनील फौजी यांनी स्वकारली आहे. बैठकीस डॉ. राकेश रफिक (वाराणसी ), अक्षय कुमार (ओडिशा), विनायक पाटील, कल्पना इनामदार, शिवाजी खेडकर (महाराष्ट्र), कमांडर यशवंत, कर्नल नैन (दिल्ली), सुशील भट्ट, भोपाल सिंह चौधरी (उत्तराखंड), गौरवकांत शर्मा, प्रताप चंद्रा, सुनील लाल, के. पी. एन. कल्कि ( उत्तर प्रदेश), राम नाईक ( कर्नाटक), दशरथ कुमार (राजस्थान), करनवीर थामन ( पंजाब ) आदींसह २४ सदस्य उपस्थित होते.

सोशल मीडियाला सूचना

इलेक्ट्रॉनिक मीडियाने नवी दिल्ली येथे होणाºया आंदोलनाच्या जनजागृतीकडे दुर्लक्ष केले आहे. कारण त्यांच्यावर केंद्र सरकारचा दबाव असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जास्तीत जास्त प्रचार-प्रसार करण्याच्या सूचना अण्णा हजारे यांनी दिल्या.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारे