शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

अकोलेतील साहित्य संमेलनात आदिवासींच्या एकीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 5:52 PM

फडकी फाउंडेशनतर्फे बुधवारी येथे आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलनात आदिवासींच्या एकीचा सूर उमटला. पशु पक्ष्यांचे हुबेहुब आवाज काढणारे तालुक्यातील उडदावणे येथील ८० वर्षीय ठकाबाबा गांगड यांना बैजू बावरा कलारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

अकोले : फडकी फाउंडेशनतर्फे बुधवारी येथे आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलनात आदिवासींच्या एकीचा सूर उमटला. पशु पक्ष्यांचे हुबेहुब आवाज काढणारे तालुक्यातील उडदावणे येथील ८० वर्षीय ठकाबाबा गांगड यांना बैजू बावरा कलारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.आदिवासी समाज मातृसत्ताक संस्कृती जपणारा असला तरी वास्तवात स्त्रियांची अवहेलना होताना व त्यांच्या हक्कांची पायमल्ली होताना दिसत आहे. त आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. आदिवासी महिला केंद्रीत साहित्य निर्मितीला प्राधान्य दिले गेले तरच आदिवासी संस्कृती अबाधित राहील, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्षा कवयित्री कुसूम आलाम (गडचिरोली) यांनी केले. कंपन्यांच्या अतिक्रमणामुळे झारखंडमध्ये आदिवासी विस्थापित होत आहेत. विस्थापित होण्याच्या मोठ्या समस्येमुळे येथील आदिवासी संस्कृती व साहित्य धोक्यात आले आहे. मराठी साहित्य हिंदीत अनुदानित झाले आणि ते झारखंडमधे पोहचले तर काही प्रमाणात बदल होऊ शकतो, असे मत जेष्ठ साहित्यिक महादेव टोप्पो(रांची) यांनी व्यक्त केले. जल, जंगल, जमीन यातच आदिवासींच्या संस्कृती असून आदिवासींच्या साहित्य संस्कृती जतन करण्यासाठी जंगल संपत्ती टिकली पाहिजे. त्यासाठी वन कायदे अधिक कडक व्हावेत. त्याची योग्य अंमलबजावणी व्हावी.तसेच वन संपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन सजगतेने व्हावे असा सल्ला सांगल्याभाई वळवी (गुजरात) यांनी यावेळी दिला. यावेळी बियाणे बँक चालविणाºया राहीबाई पोपेरे, इंद्रजित गावित, फडकीचे अध्यक्ष डॉ.संजय लोहकरे, मारूती लांघी, डॉ.तुकाराम रोंगटे, सुनील गायकवाड, उपसभापती मारूती मेंगाळ आदी उपस्थित होते.अमू अक्का एक हो....!‘अमु अक्का एक हो...!’ म्हणजे आम्ही सर्व ‘श्रमिक, कष्टकरी, शेतकरी,उपेक्षितांचं जगणं वाट्याला आलेले, धनिकांकडून शोषण केले गेले, सतत हेटाळले गेलेले’ एक आहोत. भाजप व संघवाले बोलायला चतुर आहेत. आदिवासींना वन निवासी म्हणून हेटाळत आहेत. शेतकºयांच्या पोरांची एकी त्यांना बघवत नाही. शेटजी-भटजींच्या विरोधात प्रांतिक,भाषिक, जातीय, धर्मीय असे सर्व भेद बाजूला ठेऊन शेतकरी श्रमिकांची एकीची मूठ घट्ट केली पाहिजे. तसेच रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे व भयावह किटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतजमीन, माती वांझ,निर्जिव होत चालली आहे. त्यासाठी जनजागृती केली पाहिजे. सर्व भेद विसरुन शेतकºयांच्या मुलांनी ‘घामाचं योग्य दाम’ मिळविण्याच्या लढ्यासाठी सिध्द व्हा, असे आवाहन मार्क्सवादी किसान सभेचे राज्य सचिव डॉ.अजित नवले यांनी केले. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले