शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

हत्याकांडानंतर कोतकर गुंजाळच्या संपर्कात : सरकारी पक्षाचा युक्तिवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 11:43 AM

केडगाव येथे शिवसैनिकांचे हत्याकांड झाल्यानंतर भानुदास कोतकर हा मुख्य मारेकरी संदीप गुंजाळ व सुवर्णा कोतकर यांच्या संपर्कात होता

अहमदनगर : केडगाव येथे शिवसैनिकांचे हत्याकांड झाल्यानंतर भानुदास कोतकर हा मुख्य मारेकरी संदीप गुंजाळ व सुवर्णा कोतकर यांच्या संपर्कात होता. तसेच कोतकर याची प्रकृती ठणठणीत असल्याने त्याचा जामीन अर्ज मंजूर करू नये, असा युक्तिवाद सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. केदार केसकर यांनी केला.केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या भानुदास कोतकर याच्यावतीने जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. या अर्जावर सोमवारी आरोपी पक्षाच्यावतीने युक्तिवाद केला. कोतकरला राजकीय षडयंत्रातून गुन्ह्यात अडकविले आहे. तसेच तो दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याने त्याला जामीन मंजूर करावा अशी मागणी करण्यात आली होती. यावर सरकारी पक्षाने कोतकरची वैद्यकीय जामिनावर सुटका झाल्यानंतर केडगाव हत्याकांड घडलेले आहे. केडगाव हे शहरापासून दूर आहे. त्यामुळे कोतकरला राजकीय द्वेषातून अडकवले असल्याच्या आरोपी पक्षाच्या म्हणण्यात तथ्य नाही, तसेच कोतकर यांची प्रकृती ठणठणीत आहे. तसा जबाब स्वत: कोतकर यानेच सीआयडी अधिकाऱ्यांना दिला असल्याचेही केसकर यांनी स्पष्ट केले. या अर्जावर आता न्यायालय बुधवारी निर्णय देणार आहे. दरम्यान सरकारी वकील यांनी कोतकर याच्याविरुध्द दाखल असलेल्या ३२ गुन्ह्यांची यादी न्यायालयासमोर सादर केली. हे सर्व गुन्हे जीविताशी निगडीत असल्याचे केसकर यांनी सांगितले. आरोपी पक्षाच्या वकिलांनी आक्षेप घेत कोतकर याच्याविरुध्द कमी गुन्हे असल्याचे सांगितले. मात्र, तसे असल्यास न्यायालयाच्या सर्टीफाईड कॉपी सादर करणे आवश्यक असल्याचे सरकारी वकील केसकर यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीसKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड