शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

एकात्मिक गृहनिर्माणचे ४ कोटी गेले परत; कोपरगावात नव्याने ३ हजार घरकुलांचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 4:03 PM

२०१४ मध्ये राज्यात सत्तांतर होऊन भाजप-शिवसेना सरकार आरूढ झाले. आणि केंद्र सरकारने ही योजनाच बंद करून पंतप्रधान आवास योजना अस्तित्वात आणली. २०१५ अखेरपर्यंत एकात्मिक गृहनिर्माण योजनेचे काम सुरू न झाल्याने मंजूर ४ कोटींचा निधी परत सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे.

रियाज सय्यदकोपरगाव : राज्य शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण योजनेचे काम नगरपालिका हद्दीत २०१५ पर्यंत वेळेमध्ये सुरू होऊ न शकल्याने सुमारे ४ कोटी रूपयांचा निधी परत गेला आहे. त्यामुळे आता पंतप्रधान आवास योजने अंतर्गत शहरात ३ हजार १०८ घरकुलांची निर्मिती केली जाणार आहे.सन २०१०-११ साली एकात्मिक गृहनिर्माण योजनेच्या अनुषंगाने पालिकेला ४ कोटी रूपयांचा निधी मिळाला होता. तत्कालिन पालिका पदाधिकाºयांनी खडकी परिसरात ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला. मात्र स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे हे काम २-३ वर्षे रखडले. पुढे २०१४ मध्ये राज्यात सत्तांतर होऊन भाजप-शिवसेना सरकार आरूढ झाले. आणि केंद्र सरकारने ही योजनाच बंद करून पंतप्रधान आवास योजना अस्तित्वात आणली. २०१५ अखेरपर्यंत एकात्मिक गृहनिर्माण योजनेचे काम सुरू न झाल्याने मंजूर ४ कोटींचा निधी परत सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे.२०१६-१७ पासून पंतप्रधान आवास योजने अंतर्गत नगरपालिकेस ३ हजार १०८ घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले आहे. पहिल्या टप्प्यात १० टक्के म्हणजेच ३०८ घरांची उभारणी केली जाणार आहे. महेंद्रकुमार दवे अ‍ॅण्ड असोसिएट्स या ठेकेदारामार्फत शहरातील २ हजार घरांचे सर्व्हेक्षण झाले आहे. २०२२ मध्ये हे काम पूर्ण होणार आहे. त्यासाठी लाभार्र्थींनी आवश्यक कागदपत्रांसह तातडीने पालिकेत संपर्क साधावा.-शिल्पा दरेकर, मुख्याधिकारी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरGovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान