शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

ग्रामपंचायतीसाठी २३ हजार अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 4:14 AM

अहमदनगर : जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतीच्या ७ हजार १३४ जागांसाठी तब्बल २३ हजार ८१८ अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक ...

अहमदनगर : जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतीच्या ७ हजार १३४ जागांसाठी तब्बल २३ हजार ८१८ अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक २ हजार ६७८ अर्ज संगमनेर तालुक्यात दाखल झाले आहेत. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत अर्जांची छाननी सुरू होती. शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतल्यानंतर सोमवारी (दि. ४) ग्रामपंचायतीमधील लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे.

जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतीसाठी ७ हजार १३४ जागांसाठी जिल्ह्यात तब्बल २३ हजार ८१८ इतके अर्ज दाखव झाले. शेवटच्या दिवशी बुधवारी (दि. ३०) सर्वाधिक १५ हजार ५५२ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज स्वीकारण्यासाठी ऑफलाईनची सवलत देण्यात आली होती. तसेच जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करण्यासाठीही ऑफलाईन सवलत देण्यात आली होती. एकूण सदस्यसंख्येच्या तिप्पटीपेक्षा जास्त अर्ज दाखल झाले आहेत. बहुतांश ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढतीची शक्यता आहे. अर्ज माघारी घेतल्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

-----------

तालुका ग्रा. पं. सदस्य संख्या एकूण अर्ज

अकोले ५२ ४६६ ११५३

संगमनेर ९४ ८६७ २६७८

कोपरगाव २९ २७९ ९९६

श्रीरामपूर २७ ३०१ ११०९

राहाता २५ ४१८ १२०८

राहुरी ४४ ५१९ १४०७

नेवासा ५९ ५८३ २०७२

नगर ५९ ७७६ १९२९

पारनेर ८८ ६८० २३८९

पाथर्डी ७८ ४०८ १३३२

शेवगाव ४८ ५०४ १७५२

कर्जत ५६ ५०४ १७६२

जामखेड ४९ ४१७ १३०२

श्रीगोंदा ५९ ५६५ २१६३

एकूण ७६७ ७१३४ २३८१८

-----

अशी आहे निवडणूक

एकूण ग्रामपंचायती- ७६७

एकूण सदस्य संख्या- ७ हजार १३४

एकूण प्रभाग संख्या -२ हजार ६२९

मतदान केंद्र संख्या -२ हजार ८५९

एकूण मतदार- १५ लाख ५० हजार ४९१

पुरुष मतदार- ८ लाख १३ हजार ३१

महिला मतदार- ७ लाख ३७ हजार ४५१