शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

१२०० शाळांची सोमवारी वाजणार घंटा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 12:08 PM

सोमवारपासून (दि.२३) राज्यातील नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याबाबतच्या सूचना शासनाने दिल्यानंतर तशी तयारी स्थानिक पातळीवर सुरू झाली असून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या १२०९ शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अहमदनगर : सोमवारपासून (दि.२३) राज्यातील नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याबाबतच्या सूचना शासनाने दिल्यानंतर तशी तयारी स्थानिक पातळीवर सुरू झाली असून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या १२०९ शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंत १२०९ शाळा असून त्यात सुमारे २ लाख ८४ हजार विद्यार्थी आहेत. या शाळांमध्ये सुमारे १० हजार शिक्षक व ६ हजार शिक्षकेतर कर्मचारी असा एकूण १६ हजार कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. सोमवारपासून शाळा सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिल्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागाने तशी तयारी सुरू केली आहे. प्रथम सर्व शिक्षकांची कोविड चाचणी करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर शाळा सॅनिटायझेशन, तसेच इतर स्वच्छता शाळांनी आपापल्या पातळीवर सुरू करावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

पालकांचे संमतीपत्र घेऊन शाळा सुरू होणार असल्याने पहिल्या दिवशी किती शाळा सुरू होणार किंवा किती विद्यार्थी शाळेत येणार हे जरी अद्याप अस्पष्ट असले तरी स्थानिक कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन मुख्याध्यापकांनी निर्णय घ्यायचा आहे.

तीन हजार शिक्षकांची चाचणी

एकूण १० हजार शिक्षकांपैकी तीन हजार शिक्षकांची चाचणी पूर्ण झाली असून अद्याप ७ हजार शिक्षकांच्या चाचणीचे आव्हान शिक्षण विभागापुढे आहे. चाचणीचा अहवाल पाहूनच मुख्याध्यापकांनी शिक्षकांना शाळेत प्रवेश द्यायचा आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये शिपायांची आवश्यकता शाळेत पहिल्या दिवशीपासून भासणार आहे. दुसरीकडे शासकीय केंद्रांवर चाचणीसाठी शिक्षकांची गर्दी होत असून कोविड सेंटरवरील नियोजन बिघडल्याचे निदर्शनास येत आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरEducation Sectorशिक्षण क्षेत्रzp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थी