शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
3
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
4
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
5
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
6
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
7
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
8
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
9
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
10
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
11
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
12
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
13
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
14
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
15
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
16
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
17
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
18
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
19
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
20
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

नगर जिल्ह्यात २०५ पैकी १० ग्रामपंचायती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 5:05 PM

अहमदनगर : जिल्ह्यातील २०५ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेत बुधवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी दाखल ७५०५ अर्जांमधून २९४६ जणांनी माघार घेतली. यात १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. याशिवाय सर्व ग्रामपंचायतींमधून ३४९ सदस्यही बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे आता सरपंचपदासाठी ६३७, तर सदस्यांमधून ३५५० असे एकूण ४१८७ उमेदवार रिंगणात आहेत. ७ आॅक्टोबर रोजी या ठिकाणी मतदान होत आहे.

अहमदनगर : जिल्ह्यातील २०५ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेत बुधवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी दाखल ७५०५ अर्जांमधून २९४६ जणांनी माघार घेतली. यात १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. याशिवाय सर्व ग्रामपंचायतींमधून ३४९ सदस्यही बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे आता सरपंचपदासाठी ६३७, तर सदस्यांमधून ३५५० असे एकूण ४१८७ उमेदवार रिंगणात आहेत. ७ आॅक्टोबर रोजी या ठिकाणी मतदान होत आहे.नोव्हेंबर ते डिसेंबर २०१७ या कालावधीत मुदत संपणाºया जिल्ह्यातील २०५ ग्रामपंचायतींसाठी ७ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. यावेळी पहिल्यांदाच सरपंचपद थेट जनतेतून निवडले जात आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. सरपंचपदाच्या २०५ जागांसाठी १३२९ अर्ज आले होते. बुधवारी माघारीच्या दिवशी त्यातील जवळपास निम्म्या जणांनी (६९१) माघार घेतल्याने ६३७ जण रिंगणात आहेत.तसेच सदस्यांच्या एकूण १९४० जागांसाठी ६१७६ अर्ज आले होते. त्यातील २२५५ जणांनी माघार घेतल्याने आता ३५५० जण रिंगणात आहेत. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर पाच ग्रामपंचायतींमध्ये सर्व सदस्य बिनविरोध झाले, परंतु तेथे केवळ सरपंचपदासाठी लढत होत आहे.बिनविरोध ग्रामपंचायतीशिळवंडी (ता.अकोले), डोळासणे, कर्जुले पठार, रणखांब (ता. संगमनेर), वडगाव, भोजडे (ता. कोपरगाव), कमालपूर (ता. श्रीरामपूर), लोहगाव (ता. राहाता), ब्राम्हणगाव मांड (ता. राहुरी), म्हस्केवाडी (ता. पारनेर).सदस्य बिनविरोध, सरपंचांत लढतचिकणी, वडझरी, जांभूळवाडी (ता. संगमनेर), सुरेशनगर (ता. नेवासा), बनपिंप्री(ता. श्रीगोंदा) या ५ ग्रामपंचायतींमधील सर्व सदस्य बिनविरोध झाले, परंतु येथे सरपंचपदासाठी लढत होत आहे.