शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जिल्हा परिषदेत सडतेय लाखो रुपयांचे साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 14:13 IST

जिल्हा परिषदेने लाखो रुपये खर्च करुन विकत घेतलेले मौल्यवान साहित्य जिल्हा परिषदेच्या जुन्या सभागृहात अक्षरश: सडत पडले आहे़.

साहेबराव नरसाळे । अहमदनगर : जिल्हा परिषदेने लाखो रुपये खर्च करुन विकत घेतलेले मौल्यवान साहित्य जिल्हा परिषदेच्या जुन्या सभागृहात अक्षरश: सडत पडले आहे़. मात्र, या साहित्याचा लिलाव करण्याची किंवा कर्मचारी विकत घेण्यास तयार असतानाही ते त्यांना न देता ते सडवण्याची भूमिका जिल्हा परिषद प्रशासनाने घेतल्याचे दिसत आहे़.जिल्हा परिषदेचा कारभार जुन्या इमारतीतून नव्या इमारतीत २००७ साली स्थलांतरित झाला़. त्यावेळी जिल्हा परिषदेने जुन्या इमारतीतील कोणतेही साहित्य नव्या इमारतीत आणले नाही़. जुने सर्व साहित्य जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीतील अण्णासाहेब शिंदे सभागृहात व बांधकाम विभाग (दक्षिण), आरोग्य व पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयात ठेवण्यात आले़. या साहित्याचा लिलाव करण्याची मागणी वारंवार जिल्हा परिषदेकडे करण्यात आली़. तसेच हे साहित्य बाहेर विकायचे नसल्यास कर्मचा-यांनीही ते विकत घेण्याची तयारी दर्शविली होती़. हे साहित्य सागवानी व दर्जेदार असल्यामुळे ते चांगली किंमत देऊन जिल्हा परिषदेचे कर्मचारीच विकत घेण्यास तयार होते़. याबाबत कर्मचा-यांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिका-यांना निवेदन दिल्याचेही सांगण्यात येते़. मात्र, जिल्हा परिषदेने याबाबत काहीच निर्णय न घेता गेल्या १२ वर्षांपासून हे साहित्य तेथेच सडत ठेवण्याची भूमिका घेतली़. जुनी इमारत मोडकळीस आली असून, पावसाळ्यात ही इमारत गळत आहे़. त्यामुळे तेथील बरेचसे साहित्य कुजले असल्याचे सांगण्यात येते़. या जुन्या साहित्यामध्ये लोखंडी तिजो-या, लोखंडी कपाटे,  सागवानी टेबल, सागवानी खर्च्या, सागवानी कपाटे असे त्यावेळी घेतलेल्या दर्जेदार साहित्याचा समावेश आहे़. या साहित्याचा लिलाव करुन जिल्हा परिषदेला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळालेही असते़. परंतु जिल्हा परिषदेने ज्याप्रमाणे अनेक ठिकाणी असणा-या जागांच्या हक्काच्या मिळकतीवर पाणी सोडले, त्याचप्रमाणे हे जुने साहित्य विकून अगदी सहज मिळणा-या उत्पन्नावरही पाणी सोडल्याचे दिसत आहे़.उदासीनतेमुळे लाखाचे बारा हजारलोखंडी तिजोºया, लोखंडी कपाटे, सागवानी टेबल, सागवानी खुर्च्या, सागवानी कपाटे असे साहित्य गेल्या १२ वर्षांपासून तसेच पडून आहे़. यातील अनेक साहित्य कुजले आहे़. त्यामुळे आता हे साहित्य टाकूनच द्यावे लागणार आहे़. जे साहित्य विक्रीयोग्य असेल त्यालाही कवडीमोल किमतीत विकावे लागणार आहे़. त्यामुळे जिल्हा परिषदेचे लाखो रुपयांचे नुकसान अधिका-यांच्या उदासीन वृत्तीमुळे झाले असून, याबाबत कर्मचा-यांमध्येही नाराजी असल्याचे दिसून येत आहे़.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरzpजिल्हा परिषद