शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत सडतेय लाखो रुपयांचे साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 14:13 IST

जिल्हा परिषदेने लाखो रुपये खर्च करुन विकत घेतलेले मौल्यवान साहित्य जिल्हा परिषदेच्या जुन्या सभागृहात अक्षरश: सडत पडले आहे़.

साहेबराव नरसाळे । अहमदनगर : जिल्हा परिषदेने लाखो रुपये खर्च करुन विकत घेतलेले मौल्यवान साहित्य जिल्हा परिषदेच्या जुन्या सभागृहात अक्षरश: सडत पडले आहे़. मात्र, या साहित्याचा लिलाव करण्याची किंवा कर्मचारी विकत घेण्यास तयार असतानाही ते त्यांना न देता ते सडवण्याची भूमिका जिल्हा परिषद प्रशासनाने घेतल्याचे दिसत आहे़.जिल्हा परिषदेचा कारभार जुन्या इमारतीतून नव्या इमारतीत २००७ साली स्थलांतरित झाला़. त्यावेळी जिल्हा परिषदेने जुन्या इमारतीतील कोणतेही साहित्य नव्या इमारतीत आणले नाही़. जुने सर्व साहित्य जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीतील अण्णासाहेब शिंदे सभागृहात व बांधकाम विभाग (दक्षिण), आरोग्य व पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयात ठेवण्यात आले़. या साहित्याचा लिलाव करण्याची मागणी वारंवार जिल्हा परिषदेकडे करण्यात आली़. तसेच हे साहित्य बाहेर विकायचे नसल्यास कर्मचा-यांनीही ते विकत घेण्याची तयारी दर्शविली होती़. हे साहित्य सागवानी व दर्जेदार असल्यामुळे ते चांगली किंमत देऊन जिल्हा परिषदेचे कर्मचारीच विकत घेण्यास तयार होते़. याबाबत कर्मचा-यांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिका-यांना निवेदन दिल्याचेही सांगण्यात येते़. मात्र, जिल्हा परिषदेने याबाबत काहीच निर्णय न घेता गेल्या १२ वर्षांपासून हे साहित्य तेथेच सडत ठेवण्याची भूमिका घेतली़. जुनी इमारत मोडकळीस आली असून, पावसाळ्यात ही इमारत गळत आहे़. त्यामुळे तेथील बरेचसे साहित्य कुजले असल्याचे सांगण्यात येते़. या जुन्या साहित्यामध्ये लोखंडी तिजो-या, लोखंडी कपाटे,  सागवानी टेबल, सागवानी खर्च्या, सागवानी कपाटे असे त्यावेळी घेतलेल्या दर्जेदार साहित्याचा समावेश आहे़. या साहित्याचा लिलाव करुन जिल्हा परिषदेला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळालेही असते़. परंतु जिल्हा परिषदेने ज्याप्रमाणे अनेक ठिकाणी असणा-या जागांच्या हक्काच्या मिळकतीवर पाणी सोडले, त्याचप्रमाणे हे जुने साहित्य विकून अगदी सहज मिळणा-या उत्पन्नावरही पाणी सोडल्याचे दिसत आहे़.उदासीनतेमुळे लाखाचे बारा हजारलोखंडी तिजोºया, लोखंडी कपाटे, सागवानी टेबल, सागवानी खुर्च्या, सागवानी कपाटे असे साहित्य गेल्या १२ वर्षांपासून तसेच पडून आहे़. यातील अनेक साहित्य कुजले आहे़. त्यामुळे आता हे साहित्य टाकूनच द्यावे लागणार आहे़. जे साहित्य विक्रीयोग्य असेल त्यालाही कवडीमोल किमतीत विकावे लागणार आहे़. त्यामुळे जिल्हा परिषदेचे लाखो रुपयांचे नुकसान अधिका-यांच्या उदासीन वृत्तीमुळे झाले असून, याबाबत कर्मचा-यांमध्येही नाराजी असल्याचे दिसून येत आहे़.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरzpजिल्हा परिषद