शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

झिरो बजेट नैैसर्गिक शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 16:02 IST

झिरो बजेट नैैसर्गिक शेती कसणाऱ्या प्रणय गाडे या युवा शेतकºयाच्या मळ्यास भेट दिली. या शेतीला अध्यात्मिक शेती असेही म्हटले जाते.

शिवाजी पवारझिरो बजेट नैैसर्गिक शेती कसणाऱ्या प्रणय गाडे या युवा शेतक-याच्या मळ्यास भेट दिली. या शेतीला अध्यात्मिक शेती असेही म्हटले जाते. यामागील तत्त्वज्ञान प्रणयच्या तोंडून जाणून घेतले. विषमुक्त उत्पादन पद्धतीत राज्यभर आपला ठसा उमटविणा-या भैैरवनाथनगर (ता.श्रीरामपूर) येथील दिवंगत बापूसाहेब गाडे यांचा हा मुलगा. निव्वळ पैैसे कमवून देणारे हे मॉडेल नाही. पर्यावरणाचा ढासळलेला समतोल, जैववैैविध्यासह कार्बन क्रेडिट चळवळीवर बोलणारा हा अभ्यासू युवक गुगलवर केलेल्या शोधातून युरोपातील शेतीबाबतही बोलत होता.मारे पंधरा वर्षाहून अधिक काळ गाडे कुटुंबीय झिरो बजेट नैैसर्गिक शेती कसत आहे. बापूसाहेब गाडे यांनी शेतकºयांचा गट स्थापन केला होता. शेडनेट शेतीतून ढोबळी मिरचीचे उत्पादन घेणाºया जिल्ह्यातील पहिल्या काही मोजक्या शेतकºयांमध्ये त्यांचा समावेश होतो. मात्र शेतीचे भांडवलीकरण आणि ओघाने वाढलेला उत्पादन खर्च प्रत्यक्ष अनुभवयाला येत असल्याने बापूसाहेब हे पर्यायी व शाश्वत शेतीच्या शोधात होते. त्यातच त्यांची भेट सुभाष पाळेकर यांच्याशी झाली. हा काळ साधारणपणे २००२-०३ चा.वडिलांच्या निधनानंतर दोन-तीन वर्षापासून आजही हे कुटुंबीय मोठ्या चिकाटीने याच शेती पद्धतीने प्रयोग राबवत आहेत. त्यांच्या संपूर्ण पाच एकर क्षेत्रावर रासायनिक अथवा तथाकथित सेंद्रिय शेतीला जराही थारा दिला जात नाही. बहुतांशी जमीन ही उसाखालची आहे. ८६०३२ व नवविकसित ८००५ या वाणाची लागवड करतात. घरी गु-हाळ असल्याने वजनापेक्षा साखर उता-याला अधिक महत्त्व दिले जाते.आठ बाय दोन व पाच बाय दोन या आकारात एक डोळा पद्धतीने ते लागवड करतात. आठ बाय दोनकरिता एकरी अवघे दोन हजार डोळे लावले जातात. म्हणजेच फक्त ३२५ किलो वाण. एकरी चक्क दोन ते तीन टन उसाच्या वाणाचा आग्रह धरणा-या शेतक-यांच्या तोंडात मारण्याचाच हा प्रकार. उत्पादनही ६५ टनापर्यंत घेतले आहे.गेल्या दहा वर्षापासून जिल्ह्यात विविध कृषी प्रदर्शनांमध्ये गाडे कुटुंबीय सहभाग घेतात. साई अमृत या ब्रँड नावाने ते झिरो बजेट नैैसर्गिक शेतीपासून निर्मित गुळाची विक्री करतात. त्याला जिल्ह्यातच ८० रुपये किलोप्रमाणे दर मिळत आहे. साधारणपणे २० ते २५ टन गुळाची ते स्वत: विक्री करतात. काळाच्या ओघात त्यांनी स्वत: मालाला बाजार तयार केला आहे. उसात घेतलेल्या आंंतरपिकातूनही भरघोस उत्पन्न मिळते. चवळी, मूग, हरभरा यांची डाळ तयार करून घेत त्यांचीही विक्री केली जाते.प्रणय यांनी गावरान गायींचा मुक्त गोठा करण्याचे नियोजन केले आहे. श्रीरामपूर नॅचरलस या ब्रॅँड नावाने शेतकºयांच्या गटाचे विक्री केंद्र लवकर खुले होणार आहे. श्रीरामपूरकरांना विषमुक्त पालेभाज्या व कडधान्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी अवाजवी व अवास्तव दर आकारणार नाही. विक्रीतून किलोमागे एक रुपये सुभाष पाळेकर यांना चळवळीकरिता देऊ असे प्रणय याने सांगितले. निव्वळ पैैसे कमविण्याचा हेतू ठेवणाºया लोकांनी इकडे फिरकू नये. संयम आणि मेहनतीची तयारी असणारे युवक इथे तग धरतील. शेती उत्पादनात मेहनतीला शॉर्टकट मारण्याचा प्रकार हल्ली वाढला आहे. त्याबद्दल प्रणय यांनी चिंता व्यक्त केली. झिरो बजेट शेती ही एक जीवनशैैली आहे. इथे आत्मिक समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी