शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण
2
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
3
केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा
4
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
5
IND vs AUS : फक्त मैदान बदलले! टॉसवेळी टीम इंडियाच्या बाबतीत पुन्हा तेच घडलं
6
भाऊबीजला माहेरी जाण्यावरून वाद; पतीने नकार देताच पत्नी संतापली, रागाने आधी चिमुकल्याला संपवलं अन्..
7
आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
8
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
9
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
10
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
11
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
13
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
14
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
15
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
16
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
17
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
18
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
19
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
20
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'

झिरो बजेट नैैसर्गिक शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 16:02 IST

झिरो बजेट नैैसर्गिक शेती कसणाऱ्या प्रणय गाडे या युवा शेतकºयाच्या मळ्यास भेट दिली. या शेतीला अध्यात्मिक शेती असेही म्हटले जाते.

शिवाजी पवारझिरो बजेट नैैसर्गिक शेती कसणाऱ्या प्रणय गाडे या युवा शेतक-याच्या मळ्यास भेट दिली. या शेतीला अध्यात्मिक शेती असेही म्हटले जाते. यामागील तत्त्वज्ञान प्रणयच्या तोंडून जाणून घेतले. विषमुक्त उत्पादन पद्धतीत राज्यभर आपला ठसा उमटविणा-या भैैरवनाथनगर (ता.श्रीरामपूर) येथील दिवंगत बापूसाहेब गाडे यांचा हा मुलगा. निव्वळ पैैसे कमवून देणारे हे मॉडेल नाही. पर्यावरणाचा ढासळलेला समतोल, जैववैैविध्यासह कार्बन क्रेडिट चळवळीवर बोलणारा हा अभ्यासू युवक गुगलवर केलेल्या शोधातून युरोपातील शेतीबाबतही बोलत होता.मारे पंधरा वर्षाहून अधिक काळ गाडे कुटुंबीय झिरो बजेट नैैसर्गिक शेती कसत आहे. बापूसाहेब गाडे यांनी शेतकºयांचा गट स्थापन केला होता. शेडनेट शेतीतून ढोबळी मिरचीचे उत्पादन घेणाºया जिल्ह्यातील पहिल्या काही मोजक्या शेतकºयांमध्ये त्यांचा समावेश होतो. मात्र शेतीचे भांडवलीकरण आणि ओघाने वाढलेला उत्पादन खर्च प्रत्यक्ष अनुभवयाला येत असल्याने बापूसाहेब हे पर्यायी व शाश्वत शेतीच्या शोधात होते. त्यातच त्यांची भेट सुभाष पाळेकर यांच्याशी झाली. हा काळ साधारणपणे २००२-०३ चा.वडिलांच्या निधनानंतर दोन-तीन वर्षापासून आजही हे कुटुंबीय मोठ्या चिकाटीने याच शेती पद्धतीने प्रयोग राबवत आहेत. त्यांच्या संपूर्ण पाच एकर क्षेत्रावर रासायनिक अथवा तथाकथित सेंद्रिय शेतीला जराही थारा दिला जात नाही. बहुतांशी जमीन ही उसाखालची आहे. ८६०३२ व नवविकसित ८००५ या वाणाची लागवड करतात. घरी गु-हाळ असल्याने वजनापेक्षा साखर उता-याला अधिक महत्त्व दिले जाते.आठ बाय दोन व पाच बाय दोन या आकारात एक डोळा पद्धतीने ते लागवड करतात. आठ बाय दोनकरिता एकरी अवघे दोन हजार डोळे लावले जातात. म्हणजेच फक्त ३२५ किलो वाण. एकरी चक्क दोन ते तीन टन उसाच्या वाणाचा आग्रह धरणा-या शेतक-यांच्या तोंडात मारण्याचाच हा प्रकार. उत्पादनही ६५ टनापर्यंत घेतले आहे.गेल्या दहा वर्षापासून जिल्ह्यात विविध कृषी प्रदर्शनांमध्ये गाडे कुटुंबीय सहभाग घेतात. साई अमृत या ब्रँड नावाने ते झिरो बजेट नैैसर्गिक शेतीपासून निर्मित गुळाची विक्री करतात. त्याला जिल्ह्यातच ८० रुपये किलोप्रमाणे दर मिळत आहे. साधारणपणे २० ते २५ टन गुळाची ते स्वत: विक्री करतात. काळाच्या ओघात त्यांनी स्वत: मालाला बाजार तयार केला आहे. उसात घेतलेल्या आंंतरपिकातूनही भरघोस उत्पन्न मिळते. चवळी, मूग, हरभरा यांची डाळ तयार करून घेत त्यांचीही विक्री केली जाते.प्रणय यांनी गावरान गायींचा मुक्त गोठा करण्याचे नियोजन केले आहे. श्रीरामपूर नॅचरलस या ब्रॅँड नावाने शेतकºयांच्या गटाचे विक्री केंद्र लवकर खुले होणार आहे. श्रीरामपूरकरांना विषमुक्त पालेभाज्या व कडधान्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी अवाजवी व अवास्तव दर आकारणार नाही. विक्रीतून किलोमागे एक रुपये सुभाष पाळेकर यांना चळवळीकरिता देऊ असे प्रणय याने सांगितले. निव्वळ पैैसे कमविण्याचा हेतू ठेवणाºया लोकांनी इकडे फिरकू नये. संयम आणि मेहनतीची तयारी असणारे युवक इथे तग धरतील. शेती उत्पादनात मेहनतीला शॉर्टकट मारण्याचा प्रकार हल्ली वाढला आहे. त्याबद्दल प्रणय यांनी चिंता व्यक्त केली. झिरो बजेट शेती ही एक जीवनशैैली आहे. इथे आत्मिक समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी