पाणी फाउंडेशनचे कार्य लोकचळवळ बनले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:25 IST2021-09-05T04:25:51+5:302021-09-05T04:25:51+5:30
पाणी फाउंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा २०२०-२०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. ०४) घुलेवाडीतील (नाशिक ...

पाणी फाउंडेशनचे कार्य लोकचळवळ बनले
पाणी फाउंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा २०२०-२०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. ०४) घुलेवाडीतील (नाशिक रस्ता) अमृता लॉन्स येथे ‘समृद्धीच्या वाटेवरील गावांचा सन्मान सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. पोळ बोलत होते.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील मांची, सावरगाव तळ, पेमगिरी, भोजदरी, कुंभारवाडी, खंदरमाळवाडी, पिंपळगाव माथा, पिंपळगाव देपा, मोधळवाडी, खरशिंदे, कणसेवाडी, म्हसवंडी, पोखरी बाळेश्वर, सायखिंडी या समृद्ध गाव स्पर्धेतील सहभागी पात्र गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, जलमित्र आणि ग्रामस्थांचा सन्मान करण्यात आला.
आमदार सुधीर तांबे, संगमनेर पंचायत समितीच्या सभापती सुनंदा जोर्वेकर, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, उपविभागीय वनाधिकारी संदीप पाटील, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, संदीप वायाळ, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, सामाजिक वनीकरण विभागाच्या राेपवन अधिकारी सोनाली गिरी, उमेदचे तालुका व्यवस्थापक रवींद्र खलाटे, विभागीय समन्वयक विक्रम फाटक, संगमनेर तालुका समन्वयक राजेंद्र जाधव, अजिंक्य गुरव, स्वप्निल कोल्हे,गोकुळ उगले आदी यावेळी उपस्थित होते.
ग्रामीण पर्यावरण व्यवस्थेचा आणि अर्थशास्त्राचा कायापालट करण्यासाठी राज्यात पाणी फाउंडेशनने ‘सत्यमेव जयते समृद्ध गाव’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्याद्वारे जलसंधारणातून गावात जलसमृद्धी आणण्यासाठी तालुक्यातील १२ गावांतील ग्रामस्थ मेहनत घेत आहेत.