शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

आरटीई प्रवेश पूर्वीप्रमाणे होणार का? पालकांचे लागले लक्ष

By चंद्रकांत शेळके | Updated: May 9, 2024 21:57 IST

शासनाने केलेला बदल न्यायालयाकडून रद्द

अहमदनगर: आरटीई प्रवेश प्रक्रियेला यंदा ग्रहण लागलेले दिसत आहे. एरव्ही एप्रिलपर्यंत उरकणारे प्रवेश यंदा शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जुलै, ऑगस्टपर्यंत जातात की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान केवळ इंग्रजीऐवजी १ किलोमीटरच्या कोणत्याही शाळेत प्रवेश घ्यावा लागणार हा शासनाने घेतलेला निर्णय न्यायालयाने रद्द केल्याने आता पूर्वीप्रमाणे इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश होणार का? याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

आरटीई कायद्यांतर्गत खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवर दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. या प्रवेशांसाठी राज्य सरकारकडून खासगी शाळांना शुल्क प्रतिपूर्ती केली जाते. मात्र फेब्रुवारीमध्ये राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने आरटीई कायद्यात बदल करून विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या परिसरातील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. या शाळांचा पर्याय उपलब्ध नसेल तरच खासगी स्वयंअर्थसाहाय्यित शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल, असे जाहीर केले.

या निर्णयामुळे एका अर्थाने खासगी स्वयंअर्थसाहाय्यित शाळा आरटीई प्रवेशातून वगळल्या जाणार होत्या. या बदलाला पालकांमधून विरोध करण्यात आला. तसेच या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. सोमवारी उच्च न्यायालयाने शासनाच्या आरटीई कायद्यातील बदलाला स्थगिती दिली आहे. यावर पुढील सुनावणी १२ जूनला होणार आहे. तोपर्यंत शासनाकडून प्रवेशाबाबत काय धोरण घेतले जाते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.--------------प्रवेश प्रक्रिया तात्पुरती थांबवली शासनाच्या वेबसाईटवर आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू होती. १० मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. मात्र न्यायालयाच्या निकालानंतर लगेच ही प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आल्याचे संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले आहे. पुढील प्रक्रियेबाबत अद्याप शासनाकडून कोणत्याही सूचना नसल्याने जिल्हास्तरावर अधिकाऱ्यांसह पालकांमध्येही संभ्रमावस्था आहे.---------------आतापर्यंत प्रतिसाद कमीदरवर्षी राज्यात सुमारे एक लाख जागांसाठी तीन ते साडेतीन लाख अर्ज येत होते. मात्र, या वर्षी केवळ शासकीय शाळा प्रवेशासाठी उपलब्ध करून दिल्याने पालकांनी आरटीई प्रवेशाकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान आता न्यायालयाने शासनाच्या अधिसूचनेला स्थगिती दिल्याने पालकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेशाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.------------------नगर जिल्ह्यात ३ हजार अर्जराज्यात आतापर्यंत ७६ हजार ५३ शाळांमधील ८ लाख ८६ हजार ४११ राखीव जागांसाठी आतापर्यंत ६९ हजार ३६१ अर्ज दाखल झालेले आहेत. त्यात नगर जिल्ह्यात ४ हजार ५७ शाळांमधील ४८ हजार २२४ जागांसाठी ३ हजार ७३ अर्जांचा समावेश आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षणAhmednagarअहमदनगर