शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

आरटीई प्रवेश पूर्वीप्रमाणे होणार का? पालकांचे लागले लक्ष

By चंद्रकांत शेळके | Updated: May 9, 2024 21:57 IST

शासनाने केलेला बदल न्यायालयाकडून रद्द

अहमदनगर: आरटीई प्रवेश प्रक्रियेला यंदा ग्रहण लागलेले दिसत आहे. एरव्ही एप्रिलपर्यंत उरकणारे प्रवेश यंदा शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जुलै, ऑगस्टपर्यंत जातात की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान केवळ इंग्रजीऐवजी १ किलोमीटरच्या कोणत्याही शाळेत प्रवेश घ्यावा लागणार हा शासनाने घेतलेला निर्णय न्यायालयाने रद्द केल्याने आता पूर्वीप्रमाणे इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश होणार का? याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

आरटीई कायद्यांतर्गत खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवर दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. या प्रवेशांसाठी राज्य सरकारकडून खासगी शाळांना शुल्क प्रतिपूर्ती केली जाते. मात्र फेब्रुवारीमध्ये राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने आरटीई कायद्यात बदल करून विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या परिसरातील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. या शाळांचा पर्याय उपलब्ध नसेल तरच खासगी स्वयंअर्थसाहाय्यित शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल, असे जाहीर केले.

या निर्णयामुळे एका अर्थाने खासगी स्वयंअर्थसाहाय्यित शाळा आरटीई प्रवेशातून वगळल्या जाणार होत्या. या बदलाला पालकांमधून विरोध करण्यात आला. तसेच या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. सोमवारी उच्च न्यायालयाने शासनाच्या आरटीई कायद्यातील बदलाला स्थगिती दिली आहे. यावर पुढील सुनावणी १२ जूनला होणार आहे. तोपर्यंत शासनाकडून प्रवेशाबाबत काय धोरण घेतले जाते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.--------------प्रवेश प्रक्रिया तात्पुरती थांबवली शासनाच्या वेबसाईटवर आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू होती. १० मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. मात्र न्यायालयाच्या निकालानंतर लगेच ही प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आल्याचे संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले आहे. पुढील प्रक्रियेबाबत अद्याप शासनाकडून कोणत्याही सूचना नसल्याने जिल्हास्तरावर अधिकाऱ्यांसह पालकांमध्येही संभ्रमावस्था आहे.---------------आतापर्यंत प्रतिसाद कमीदरवर्षी राज्यात सुमारे एक लाख जागांसाठी तीन ते साडेतीन लाख अर्ज येत होते. मात्र, या वर्षी केवळ शासकीय शाळा प्रवेशासाठी उपलब्ध करून दिल्याने पालकांनी आरटीई प्रवेशाकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान आता न्यायालयाने शासनाच्या अधिसूचनेला स्थगिती दिल्याने पालकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेशाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.------------------नगर जिल्ह्यात ३ हजार अर्जराज्यात आतापर्यंत ७६ हजार ५३ शाळांमधील ८ लाख ८६ हजार ४११ राखीव जागांसाठी आतापर्यंत ६९ हजार ३६१ अर्ज दाखल झालेले आहेत. त्यात नगर जिल्ह्यात ४ हजार ५७ शाळांमधील ४८ हजार २२४ जागांसाठी ३ हजार ७३ अर्जांचा समावेश आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षणAhmednagarअहमदनगर