शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तपास पूर्ण होईपर्यंत जामीन घेणार नाही : आमदार संग्राम जगताप यांचा पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 21:01 IST

केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी गेल्या २० दिवसांपासून अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याविरोधात पोलिसांना अद्याप कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. पोलिसांनी अजूनही कसून तपास करावा. शेवटी ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल. तपास पूर्ण होईपर्यंत आपण जामीन घेणार नाही, असा पवित्रा आ. जगताप यांनी घेतला असल्याचे त्यांच्या वकिलांमार्फत सांगण्यात आले. त्यामुळे आ. जगताप यांचा कोठडीतील मुक्काम सध्या तरी लांबल्याचे दिसते.

ठळक मुद्देवकिलांनी दाखल केलेला जामीन अर्ज घेतला मागे

अहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी गेल्या २० दिवसांपासून अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याविरोधात पोलिसांना अद्याप कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. पोलिसांनी अजूनही कसून तपास करावा. शेवटी ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल. तपास पूर्ण होईपर्यंत आपण जामीन घेणार नाही, असा पवित्रा आ. जगताप यांनी घेतला असल्याचे त्यांच्या वकिलांमार्फत सांगण्यात आले. त्यामुळे आ. जगताप यांचा कोठडीतील मुक्काम सध्या तरी लांबल्याचे दिसते.केडगाव येथे दि. ७ एप्रिल रोजी दुहेरी हत्याकांडानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीवरून आ. संग्राम जगताप यांच्यावर हत्येचा कट असल्याचा गुन्हा दाखल झाला. त्याच रात्री त्यांना अटकही झाली. बारा दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर त्यांना बुधवारी (दि. १८) न्यायालयीन कोठडीत वर्ग करण्यात आले. त्यानंतर आठ दिवसांनी म्हणजे दि. २५ एप्रिल रोजी जगताप यांचे वकील अ‍ॅड. महेश तवले यांनी त्यांचा जामीन अर्ज न्यायालयासमोर ठेवला. परंतु या प्रकरणी पोलिसांचा अहवाल न आल्याने सरकारी वकिलांनी या संदर्भात आपले म्हणणे सादर केले नाही. त्यामुळे या जामीन अर्जावर निर्णय होऊ शकला नाही. दरम्यान, संग्राम जगताप गेले २० दिवस अटकेत असून पोलिसांना अद्यापपर्यंत त्यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळालेले नाहीत. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी विशाल कोतकर यानेही या हत्येत कोणत्याही राजकीय नेत्याचा सहभाग नसल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी आपला संबंधच नाही. त्यामुळे कसले पुरावेही नाहीत. पोलिसांनी आणखी तपास करावा. न्यायालयावर आपला विश्वास आहे. शेवटी ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत आपण जामीन घेणार नाही, असा पवित्रा घेत आ. जगताप यांनी जामीन अर्ज मागे घेण्यास सांगितल्याचे त्यांचे वकील तवले यांनी स्पष्ट केले.पोलीस अहवाल पुढील आठवड्यातआमदार शिवाजी कर्डिले यांना जामीन मिळाल्यानंतर संग्राम जगताप यांनाही जामीन होईल, अशी अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांना होती. परंतु आता संग्राम जगताप यांनीच जामीन अर्ज मागे घेतल्याने सध्या तरी त्यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीस त्यांचा अहवाल पुढील आठवड्यात देणार असल्याची माहिती आहे. त्यात आ. जगताप यांचा याप्रकरणी सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले तर त्यांना जामीन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांडsangam chowkसंगम चौक