शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

धनगर समाजाचा सरकारला एवढा राग का? उपोषणकर्त्याचा महाजनांना सवाल; २ दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन

By चंद्रकांत शेळके | Updated: September 16, 2023 20:38 IST

धनगरांविषयी या सरकारला एवढा राग कशामुळे आहे, असा थेट सवाल उपोषणकर्ते अण्णासाहेब रूपनर यांनी मंत्री गिरीश महाजन यांना विचारला.

अहमदनगर : गेल्या ११ दिवसांपासून चोंडीत आरक्षणासाठी धनगर समाजाचे उपोषण सुरू असताना या सरकारमधील एकाही मंत्र्याला उपोषणकर्त्यांची भेट घ्यावीशी वाटली नाही. धनगरांविषयी या सरकारला एवढा राग कशामुळे आहे, असा थेट सवाल उपोषणकर्ते अण्णासाहेब रूपनर यांनी मंत्री गिरीश महाजन यांना विचारला.

आरक्षणासाठी धनगर समाजाचे चोंडी (ता. जामखेड) येथे गेल्या ११ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. त्यातील अण्णासाहेब रूपनर (वय ५५) या उपोषणकर्त्याची तब्बेत खालावल्याने शुक्रवारी रात्री त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची भेट घेण्यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन शनिवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगरहून अहमदनगरला आले होते. उपोषणकर्ते रूपनर यांच्या तब्बेतीची विचारपूस करत असतानाच रूपनर यांनी संताप व्यक्त केला. घटनेत तरतूद असताना गेल्या ७० वर्षांपासून धनगर समाजाला आरक्षण देण्यास चालढकल सुरू आहे. त्यामुळे समाजबांधवांनी चोंडीत उपोषण सुरू केले. मात्र या सरकारने आंदोलनाकडे सपशेल दुर्लक्ष केले. पालकमंत्र्यांसह एकही मंत्री आंदोलनाकडे फिरकला नाही. धनगरांविषयी या सरकारला एवढा राग का आहे? आम्ही एवढ्या दिवस तुमच्या पाठिशी राहिलो, मग आम्हाला वाऱ्यावर का सोडता. दोन दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास आपण औषधोपचार व पाणीही सोडू, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला. दोन दिवसांत मुंबईत याबाबत बैठक घेऊन नक्की तोडगा काढू, असे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले. यानंतर ते चोंडी येथे उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले. त्यांच्यासोबत आमदार राम शिंदेही होते.

दरम्यान, पत्रकारांशी बोलताना मंत्री महाजन म्हणाले, उपोषणकर्ते रूपनर यांचे ९ किलो वजन कमी झाले आहे. मला माहिती मिळाल्यानंतर तातडीने दाखल झालो. त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह समाजातील लोकांची दोन दिवसांत मुंबईत बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न करू.

पालकमंत्री उपोषणाकडे का गेले नाहीत?गेल्या ११ दिवसांपासून धनगर समाजाचे उपोषण सुरू असताना जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली नाही. ते मुद्दामहून गेले नाहीत, असा समाजाचा आरोप आहे, याबाबत पत्रकारांनी मंत्री महाजन यांना विचारले असता ते म्हणाले, विखे का गेले नाहीत, याची माहिती मला नाही. मात्र मला समजल्यानंतर मी तातडीने आलो आहे. 

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षणreservationआरक्षणGirish Mahajanगिरीश महाजन