शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जब जब फुल खिले ! रंगीबेरंगी फुलांनी बहरले नगरचे कास पठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 16:12 IST

नगरचे कास पठार म्हणून ओळखल्या जाणा-या नगर तालुक्यातील अकोळनेर येथे गणेशोत्सव, मोहरम, दसरा-दिवाळी या सणांना सुंगधीत करण्यासाठी रंगी-बेरंगी फुलांचे मळे बहरले आहेत.

योगेश गुंडकेडगाव : नगरचे कास पठार म्हणून ओळखल्या जाणा-या नगर तालुक्यातील अकोळनेर येथे गणेशोत्सव, मोहरम, दसरा-दिवाळी या सणांना सुंगधीत करण्यासाठी रंगी-बेरंगी फुलांचे मळे बहरले आहेत. झेंडू, शेवंती याचबरोबर अस्टर, जर्बेरा यासारखी फुले सणासुदीसाठी सज्ज झाले आहेत. मात्र पाऊस लांबल्याने यंदा फुलांचे उत्पादन ३० ते ४० टक्क्यांनी घटणार असल्याने फुलांच्या बाजारभावात तेजी राहणार आहे. येथील फुलांना देशभरातील फुलांच्या बाजारातून मागणी असल्याने देशभर नगरी फुलांचा सुगंध दरवळणार आहे.सध्या सुरु असलेला गणेशोत्सव व मोहरम तसेच काही दिवसांवर येऊन ठेपलेला नवरात्रउत्सव आणि दसरा तसेच त्यानंतर लगेच येणा-या दिवाळी या सणांना फुलांची मोठी मागणी असते. त्यात झेंडू आणि शेवंती तर चांगलीच भाव खाऊन जाते. या फुलांचे नगरमधील मुख्य आगार असणा-या अकोळनेर (ता.नगर)येथे फुलांचे मळे यासणांसाठी सज्ज झाले आहेत. अकोळनेर बरोबरच कामरगाव, भोरवाडी, चास तसेच पारनेर तालुक्यातील गोरेगाव, सुपा, हंगा याठिकाणी नगर जिल्ह्यात सर्वात जास्त फुलांचे उत्पादन घेतले जाते. जिरायती जमीन आणि कमी पाण्यावर येणारी शेती म्हणून याभागात फुल शेती केली जाते. एकट्या अकोळनेर गावातच जवळपास १०० एकर क्षेत्रावर शेवंतीची लागवड करण्यात आली आहे. तर यावर्षी झेंडूचे उत्पादन काहीसे कमी झाले आहे. शेवंतीमध्ये यावर्षी मारीगोल्ड या नव्या प्रकारच्या शेवंतीची लागवड वाढली आहे. याबरोबरच रतलाम, राजा, गोल्डन, पेपरव्हाईट, चांदणी, भाग्यश्री, पूर्वा व्हाईट, सानिया यलो, ऐश्वर्या यासारखे शेवंतीचे प्रकार असून यांची लागवड करण्यात आली आहे. साधारण मार्च महिन्यात शेवंतीची लागवड करण्यात येते. यावर्षी पाऊस लांबल्याने फुलांच्या उत्पादनात ४० टक्के घट अपेक्षित आहे.झेंडूमध्ये पिवळा, कलकत्ता, जंबो, मारी गोल्ड यासारख्या व्हरायटी आहेत. अकोळनेर येथील फुलांना दिल्ली, हैद्राबाद, बंगलोर, नागपूर, मुंबई, बडोदा यासारख्या मोठ्या मार्केटमधून मागणी होत असते. मात्र नागपूर मार्केट मध्ये सर्वात जास्त माल जाऊनही तेथे शेतक-यांना सुविधा मिळत नाहीत अशी खंत माजी सरपंच अनिल मेहेत्रे व तुषार मेहेत्रे या शेतक-यांनी केली .भावात तेजी राहणारयंदा कमी पावसामुळे झेंडू-शेवंती याफुलांचे उत्पादन कमी होणार असल्याने आवक घटणार असून त्याचा परिणाम फुलांच्या भाववाढीत होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भाव चारपटीने वाढणार आहेत. शेवंतीचा भाव आज प्रती किलो ३०० रुपये असला तरी सणासुदीत तो ४०० रुपयांच्या घरात जाईल, असा अंदाज आहे. झेंडूच्या भावाची अशीच स्थिती राहणार आहे. झेंडू ७० रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. एकट्या अकोळनेर गावात गणेशोत्सव व मोहरमसाठी ५ कोटींची उलाढाल झाली आहे.सौंदर्य वाढले अन सुगंध मावळलाफुल शेतीत नवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्याने कमी कालावधीत आकर्षित फुलांचे उत्पादन निघू लागले पण नव्या फुलांना पहिल्यासारखा सुगंध नाही. नव्या तंत्रज्ञानात फुलांचा सुगंध हरवत चालला आहे.यावर्षी दुष्काळी स्थितीमुळे फुलांच्या उत्पादनात घट होणार आहे. शेतक-यांनी पदरमोड करून टँकरने पाणी देऊन फुले जगवली. यावर्षी ५० टक्के फुलउत्पादक शेतक-यांनी शेततळे उभारल्याने फुलांच्या शेतीला मोठा आधार झाला. यामुळे फुलांना वेळेत पाणी मिळू शकले. - रघुनाथ शेळके, शेतकरीयंदा फुलांच्या नव्या व्हरायटी आल्याने प्रथमच गणेशोत्सव व मोहरमसाठी फुले उपलब्ध झाली आहेत. लागवड झाल्यांनतर ९० दिवसात फुले येण्याच्या व्हरायटीचा हा परिणाम आहे. - आनंद भोर, फुलउत्पादक शेतकरी 

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर