शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

काँग्रेसने विखेंना काय कमी केले होते?- बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 03:28 IST

'विरोधी पक्षनेते पदाबाबत प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील'

अहमदनगर : विखे परिवाराला काँग्रेसने काहीही कमी केले नाही. सुजय यांच्या वडिलांना विरोधी पक्षनेतेपद दिले. आईला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले. असे असतानाही त्यांनी बालहट्ट करुन अडचणीच्या काळात काँग्रेस सोडली. विखेंना काँग्रेसने काय कमी केले? याचे उत्तर त्यांनीच द्यावे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री व काँग्रेसचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब थोरात यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.थोरात म्हणाले, जेव्हा जेव्हा काँग्रेस अडचणीत होती तेव्हा विखे परिवाराने दगाफटका केला. बाळासाहेब विखे यांनी ‘मसका’ काँग्रेस काढली होती. मध्यंतरी विखे पिता-पुत्र शिवसेनेतही गेले. शिवसेनेतून पुन्हा काँग्रेसमध्ये आल्यानंतरही त्यांना पक्षाने मंत्रिपद दिले. आता सुजय हे भाजपात गेले. आपल्या मुलाचा हा बालहट्ट राधाकृष्ण विखे यांनी थांबवायला हवा होता. ते स्वत: राज्यात विरोधीपक्षनेते आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांना विनंती केली होती. मात्र, त्यानंतरही हे पक्षांतर थांबले नाही. यातून चुकीचा संदेश गेला आहे.श्रेष्ठी निर्णय घेतीलमुलगा भाजपामध्ये गेल्यामुळे पक्ष राधाकृष्ण विखे यांच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत काही निर्णय घेणार का? असा प्रश्न केला असता थोरात म्हणाले, याचा निर्णय स्वत: विखेच घेतील. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व श्रेष्ठी याबाबत निर्णय घेतील. जे घडले ते अत्यंत चुकीचे व गंभीर आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलSujay Vikheसुजय विखे