शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
3
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
4
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
5
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
6
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
7
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
8
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
9
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
10
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
11
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
12
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
13
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
14
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
15
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
16
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
17
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
18
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
19
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
20
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
Daily Top 2Weekly Top 5

हवामान आधारित फळपीक विमा योजना अखेर रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:14 IST

फळबागांच्या विमा परताव्याचे ट्रिगर बदलले, जास्त पावसाच्या समावेशामुळे अहमदनगर जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक मुकले पीक विम्याला अशा मथळ्याखाली लोकमत ने ...

फळबागांच्या विमा परताव्याचे ट्रिगर बदलले, जास्त पावसाच्या समावेशामुळे अहमदनगर जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक मुकले पीक विम्याला अशा मथळ्याखाली लोकमत ने ४ जून रोजी राज्य सरकारचे लक्ष वेधले होते.

सरकारने वादळ, वारा, जास्त पाऊस, आर्द्रता यामुळे फळबागांच्या होणाऱ्या नुकसान पासून शेतकऱ्यांना संरक्षण व्हावे यासाठी हवामान आधारित फळबाग विमा योजना आणली आहे. कमी पाऊस, पावसातील खंड, आठवड्यातील जास्त पाऊस या ट्रिगरचा समावेश असल्यामुळे २०१९-२०२० पर्यंत कमी पाऊस असलेल्या भागातील शेतकऱ्यांना नुकसान झाल्याने या फळपीक विमा योजनेतून चांगले परतावे मिळाले होते. मात्र गेल्या वर्षी राज्य सरकारने या निकषांमध्ये बदल केले. कमी पाऊस, पावसातील खंड, आठवड्याचा सरासरी पाऊस हे निकष कमी करून केवळ जास्त पाऊस व आर्द्रता हे निकष टाकले. यातून डाळिंबाच्या किमान विमा परताव्यासाठी सलग पाच दिवस प्रतिदिन २५ मिमी पाऊस तर पेरूसाठी सलग चार दिवस ५० मिमी पाऊस नोंदला जाणे आवश्यक होता. मात्र कमी पावसाच्या भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात सलग पाऊस पडणे शक्य नसल्याने गेल्या वर्षीचे फळबागांचे मोठे नुकसान होऊन ही विम्याचे परतावे मिळाले नाही. फळबागांच्या विम्याचा प्रती एकरी विमा हप्ता मोठा आहे.

चुकीच्या निकषामुळे शेतकरी नुकसान होऊन ही विमा मिळविण्यास पात्र होत नव्हते .त्यामुळे सरकारने या क्लिष्ट व विमा कंपनी धार्जीने निकषांमध्ये बदल करून २०१९ पूर्वीचे निकष लागू करावेत,अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत होती. याबाबत ‘लोकमत’ वेळोवेळी शेतकऱ्यांची ही भूमिका मांडली होती. त्याची दखल घेत राज्य सरकारने सध्याची हवामान आधारित फळपीक विमा योजना रद्द केली असून ऑनलाईन विमा पोर्टलही बंद केले आहे.

...............

२०२० ते २०२३ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी जे निकष होते ते निकष सरकारने परिपत्रक काढून रद्द केले असले तरी नवीन निकषांचे परिपत्रक अद्याप आलेले नाही. लवकरच नवीन निकष असलेली फळपीक विमा योजना जाहीर होईल.

- बापूसाहेब शिंदे, तालुका कृषी अधिकारी,राहाता

180621\185182b.jpg

"फळबागांच्या विमा परताव्याचे ट्रिगर बदलले,जास्त पावसाच्या सामावेशामुळे अहमदनगर जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक मुकले पीक विम्याला" या मथळ्याखाली ४ जून रोजीच्या "लोकमत"मधील वृत्ताने सरकारचे लक्ष वेधले होते.