शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही जनतेची सेवा करू - शालिनी विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 18:00 IST

सुजय विखे डॉक्टर आहे. सामाजिक प्रश्नांची नाडी ओळखून तो सर्व समस्या दूर करील. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यत आम्ही जनतेची सेवा करू, असा शब्द मी आज कर्जतकरांना देत आहे, अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी दिली.

कर्जत : सुजय विखे डॉक्टर आहे. सामाजिक प्रश्नांची नाडी ओळखून तो सर्व समस्या दूर करील. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यत आम्ही जनतेची सेवा करू, असा शब्द मी आज कर्जतकरांना देत आहे, अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी कर्जत महोत्सवाच्या सांगता समारंभात बोलताना दिली.कर्जत येथील गोदड महाराज क्रीडा नगरीत जनसेवा फौडेंशन, पंचायत समिती कर्जत व महिला विकास महामंडळ, कर्जत तालुका कृषीविभाग यांच्या वतीने २४ ते २६ फेब्रवारी असे तीन दिवस लेक वाचवा आभियान अंतर्गत सक्षम महिला कर्जत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याची सांगता मंगळवारी झाली. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ सुजय विखे यांनी केले होते. याप्रसंगी डॉ.सुजय विखे, सुनंदा पिसाळ, योगिता सोनमाळी, पूजा मेहत्रे, मोनाली तोटे, मिर्झा बेग, अंबादास पिसाळ, प्रविण घुले, दादासाहेब सोनमाळी, कैलास शेवाळे, सचिन घुले, हर्षल शेवाळे, डॉ संदीप काळदाते, राजकुमार आंधळकर, बापूराव गायकवाड, रामचंद्र गांगर्डे, बाळासाहेब सपकाळ, चंदन भिसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.विखे पुढे म्हणाल्या, पद्मश्री विखे पाटील यांनी विखे परिवार हा गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, युवती यांच्यासह सर्व समाजाच्या सर्व जातीधर्माच्या नागरिकांची सेवा करणे, त्यांचे प्रश्न व अडचणी सोडविण्याचा वारसा घालून दिला आहे. हाच वारसा डॉ.सुजय विखे हे पुढे चालवीत आहेत. साई ज्योती महिला बचत गटाने महिलांना सक्षम करणाची चळवळ सुरू केली. आज जिल्ह्यात हजारो बचत गट निर्माण झाले असून ते महिलांना पायावर उभा करीत आहेत. ग्रामीण भागातील महिला पण कर्तबगार आहेत. त्यांना संधी मिळण्याची गरज आहे. तीन दिवसाच्या मोहत्सवास जनतेने प्रंचड प्रतिसाद दिला आहे. आम्ही विखे कुटुंब कर्जतच्या जनतेचे ऋण कधीच विसरणार नाही,असे त्या म्हणाल्या.डॉ. सुजय विखे म्हणाले, तीन दिवस चाललेल्या या महोत्सवास किमान ५० हजार नागरिक, महिला, युवक आणि युवती यांनी भेट दिली आहे. कार्यक्रम यशस्वी होवू नये म्हणून काही जणांनी छुपा विरोधही केला, मात्र येथे आलेल्या सर्व माता आणि भगिनी यांनी चांगले काम करणाºयाच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत हे या विरोध करणाराना दाखवून दिले आहे.

कर्जतकरांनी केला मायलेकरांचा नागरी सत्कार

कर्जतसारख्या दुष्काळी आणि जिल्ह्यातील दुर्लक्षीत तालुक्यामध्ये येवून येथे महिलांसाठी कार्यक्रम घेतला. बचतगट, महिला व युवक, युवती यांना एक व्यासपीठ दिले. याबद्दल कर्जत तालुक्यातील सर्वपक्षीय नागरिकांच्या वतीने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे व डॉ. सुजय विखे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जतShalini Vikhe Patilशालिनी विखे पाटीलSujay Vikheसुजय विखे