शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

महापूरप्रश्नी यापुढेही समन्वय ठेऊ; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 13:57 IST

कर्नाटक व महाराष्ट्र शासनाच्या योग्य समन्वयामुळेच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती रोखण्यात यश आले.

कर्नाटक व महाराष्ट्र शासनाच्या योग्य समन्वयामुळेच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती रोखण्यात यश आले. याबद्दल शिरोळ तालुक्याच्या वतीने राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा माजी आमदार उल्हास पाटील, धनाजीराव जगदाळे यांनी आभार व्यक्त करत संगमनेर येथे सत्कार केला. 

यावेळी बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, अलमट्टी आणि हिप्परगी धरणातून वेळीच विसर्ग होण्यासाठी शासनाने प्रयत्न केले. अलमट्टी बरोबरच हिप्परगीचे कारण शासनाच्या लक्षात आल्याने विसर्गावर विशेष लक्ष दिले गेले. त्यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महापूर टळू शकला. यापुढेही महाराष्ट्र शासन समन्वयाची भूमिका ठेऊन महापूर टाळण्यासाठी प्रयत्नशील असेल अशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.

माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून महापूरप्रश्नी आम्ही निवेदन दिले. याची वेळीच दखल घेऊन मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीत महापुराच्या कारणांची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. अलमट्टी व हिप्परगी धरणातून विसर्ग होण्यासाठी शासनाने समन्वय राखल्याने पूरस्थिती रोखता आली. मंत्री विखे पाटील यांनी स्वतः याप्रश्नी लक्ष दिल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील जनतेला दिलासा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील, नृसिंहवाडीचे माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, आबासाहेब थोरात, दिलीपराव शिंदे, पृथ्वीराज थोरात आदी उपस्थित होते.  

टॅग्स :floodपूरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील