शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

वांबोरी चारीचे पाणी लोहसरपर्यंत पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 16:15 IST

‘लोकमत’ने वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर वांबोरी चारीला पाणी सोडण्यात आले. गुरुवारी रात्री ११ वाजता तालुक्यातील लोहसर गावातील तलावात पाणी आल्याने या भागातील शेतक-यांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

करंजी : वांबोरी चारीचे पाणी पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांना मिळावे यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी व शेतक-यांनी वेळवेळी आंदोलने केली. ‘लोकमत’ने वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर वांबोरी चारीला पाणी सोडण्यात आले. गुरुवारी रात्री ११ वाजता तालुक्यातील लोहसर गावातील तलावात पाणी आल्याने या भागातील शेतक-यांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.  सलग दोन वषार्पासून दुष्काळाशी सामना करता-करता या भागातील शेतक-यांचे हालहाल झाले. संत्रा, मोसंबी, डाळिंबाच्या जपलेल्या बागा या भागातील शेतक-यांच्या डोळ्यादेखत जळून गेल्या. दावणीची दुभती जनावरे सहा महिन्यापासू्न छावणीत गेली. या भागातील करंजी परिसरातील दगडवाडी, भोसे, वैजू बाभुळगाव, लोहसर, खांडगाव, जोहारवाडी, सातवड, कौडगावसह अनेक गावातील विहिरी, बोअरवेल आटून गेले. पिण्याच्या पाण्याची पावसाळ्यात तीव्र टंचाई जाणवत असून अनेक गावात टँकर चालू आहेत. या दुष्काळी भागाला पाणी मिळावे म्हणून मुळा धरणातून वांबोरी चारी योजना करण्यात आली. ही योजना पूर्ण होवून दहा वर्ष झाली तरी योजनेचे पाणी कधी या भागाला मिळाले नाही.   मागच्या वषीर्ही या भागात पाऊस झाला नाही. दुष्काळावर मात करण्यासाठी या भागाला वांबोरी चारीचे पाणी सोडावे म्हणून या भागातील नागरिकांनीतीव्र आंदोलने केली. ‘लोकमत’ने वेळोवेळी पाठपुरावा केल्याने वांबोरी चारीला पाणी सोडण्यात आले. मात्र पाणी चोरी, फूट तूट, अपूर्ण काम यामुळे या भागातील मढी, घाटसिरसच्या पुढे पाणी गेले नाही. यावर्षी पुन्हा या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने वांबोरी चारीचे आंदोलन या भागात सुरु झाले. त्यामुळे प्रशासनाने वांबोरी चारीला पाणी सोडले. तालुक्यातील लोहसर गावापर्यंत पोहोचले आहे.   वांबोरी चारीचे पाणी तालुक्यातील लोहसर गावापर्यंत पूर्ण दाबाने आले आहे. या भागातील नागरिकांच्या लढ्यामुळे व ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे चारीला पाणी आले, असे वांबोरी चारी समितीचे समन्वयक संतोष आठरे यांनी सांगितले.वांबोरी चारी पाईपलाईन योजनेव्दारे १०२ पाझर तलाव भरण्याची योजना आहे. पूर्ण क्षमतेने योजना चालू राहिल्यास या भागातील दुष्काळाची तिव्रता कमी होईल, असे सातवड गावचे उपसरपंच राजेंद्र पाठक यांनी सांगितले.  

टॅग्स :mula muthaमुळा मुठाWaterपाणी