शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४११ टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 11:24 IST

जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून गेल्या चार महिन्यांतच टँकरची संख्या चारशेच्या पुढे गेली आहे. हिवाळ्यातच सुमारे सव्वासात लाख लोकांना टँकरने पाणी द्यावे लागत असून अजून उन्हाळ्याचे चार महिने बाकी आहेत.

अहमदनगर : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून गेल्या चार महिन्यांतच टँकरची संख्या चारशेच्या पुढे गेली आहे. हिवाळ्यातच सुमारे सव्वासात लाख लोकांना टँकरने पाणी द्यावे लागत असून अजून उन्हाळ्याचे चार महिने बाकी आहेत. त्यामुळे यंदा टँकरची संख्या हजारी पार करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.यंदाचा पावसाळा संपूर्ण कोरडा गेला. पावसाने सरासरीही गाठली नाही. त्यामुळे खरिपासह रब्बी हंगामही शेतकऱ्यांच्या हातातून निसटला. सुदैवाने धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांचे साठे बºयापैकी आहेत. आॅक्टोबरपासूनच जिल्ह्यात टंचाईने डोके वर काढल्याने टँकर सुरू करण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकाºयांनी धरणांतील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवत जुलैपर्यंत पुरेल एवढ्या पाण्याचे नियोजन केले. अद्याप हिवाळाच सुरू आहे. एकीकडे आॅक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या चार महिन्यांत जिल्ह्यात पारा निच्चांकी घसरला असला तरी दुसरीकडे टँकरची संख्या भर हिवाळ्यातही वाढतच गेली. आजअखेर जिल्ह्यात ४११ टँकरने ७ लाख १९ हजार ८२२ लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे.अजून फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे असे उन्ह्याळ्याचे चार महिने जायचे आहेत. या काळात तीव्र पाणी व चाराटंचाई भेडसावणार असल्याने टँकरची संख्या एक हजारच्या वर जाण्याची दाट शक्यता आहे. गेल्या १७ वर्षांच्या इतिहासात टँकरची संख्या साडेआठशेच्या वर गेलेली नाही. २००३मध्ये ६९९, सन २०१२मध्ये ७०७ व २०१५मध्ये ८२६ टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता.यंदा मात्र उन्हाळा सुरू होण्याआधीच टँकर चारशेच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे हा आकडा तिप्पट होण्याची दाट आहे.टँकरच्या आवाजाकडेच डोळेग्रामीण भागात टँकर आल्यानंतर लगबगीने पाणी भरणे हेच लोकांचे मुख्य काम सध्या झालेले आहे. शेतात काडीचेही काम नाही अन् गावातील विहिरी, बारवात पाण्याचा टिपका नसल्याने सकाळपासून टँकरची वाट पाहणे हीच महिला वर्गाची ड्युटी बनली आहे. सार्वजनिक विहिरीत टँकरचे पाणी सोडले की एकच झुंबड उडते अन् अर्ध्या तासात विहीर पुन्हा रिकामी केली जाते. काही ठिकाणी गल्लोगल्ली जाऊन प्रतिमाणसी मोजून पाणी दिले जाते.जनावरांच्या पाण्याचा हिशोब नाहीदररोज प्रतिव्यक्ती २० लिटर याप्रमाणे टँकरने पाणीपुरवठा केला जातो. या हिशोबाने लोकसंख्येच्या प्रमाणात तीन ते चार खेपा केल्या जातात. परंतु यामध्ये जनावरांसाठी पाण्याची तरतूद नसल्याने शेतकºयांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. छावण्या सुरू करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली असली तरी अद्याप जिल्ह्यात कोठेही छावणी सुरू झालेली नाही.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय