शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

जिल्ह्यात ४११ टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 11:24 IST

जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून गेल्या चार महिन्यांतच टँकरची संख्या चारशेच्या पुढे गेली आहे. हिवाळ्यातच सुमारे सव्वासात लाख लोकांना टँकरने पाणी द्यावे लागत असून अजून उन्हाळ्याचे चार महिने बाकी आहेत.

अहमदनगर : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून गेल्या चार महिन्यांतच टँकरची संख्या चारशेच्या पुढे गेली आहे. हिवाळ्यातच सुमारे सव्वासात लाख लोकांना टँकरने पाणी द्यावे लागत असून अजून उन्हाळ्याचे चार महिने बाकी आहेत. त्यामुळे यंदा टँकरची संख्या हजारी पार करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.यंदाचा पावसाळा संपूर्ण कोरडा गेला. पावसाने सरासरीही गाठली नाही. त्यामुळे खरिपासह रब्बी हंगामही शेतकऱ्यांच्या हातातून निसटला. सुदैवाने धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांचे साठे बºयापैकी आहेत. आॅक्टोबरपासूनच जिल्ह्यात टंचाईने डोके वर काढल्याने टँकर सुरू करण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकाºयांनी धरणांतील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवत जुलैपर्यंत पुरेल एवढ्या पाण्याचे नियोजन केले. अद्याप हिवाळाच सुरू आहे. एकीकडे आॅक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या चार महिन्यांत जिल्ह्यात पारा निच्चांकी घसरला असला तरी दुसरीकडे टँकरची संख्या भर हिवाळ्यातही वाढतच गेली. आजअखेर जिल्ह्यात ४११ टँकरने ७ लाख १९ हजार ८२२ लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे.अजून फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे असे उन्ह्याळ्याचे चार महिने जायचे आहेत. या काळात तीव्र पाणी व चाराटंचाई भेडसावणार असल्याने टँकरची संख्या एक हजारच्या वर जाण्याची दाट शक्यता आहे. गेल्या १७ वर्षांच्या इतिहासात टँकरची संख्या साडेआठशेच्या वर गेलेली नाही. २००३मध्ये ६९९, सन २०१२मध्ये ७०७ व २०१५मध्ये ८२६ टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता.यंदा मात्र उन्हाळा सुरू होण्याआधीच टँकर चारशेच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे हा आकडा तिप्पट होण्याची दाट आहे.टँकरच्या आवाजाकडेच डोळेग्रामीण भागात टँकर आल्यानंतर लगबगीने पाणी भरणे हेच लोकांचे मुख्य काम सध्या झालेले आहे. शेतात काडीचेही काम नाही अन् गावातील विहिरी, बारवात पाण्याचा टिपका नसल्याने सकाळपासून टँकरची वाट पाहणे हीच महिला वर्गाची ड्युटी बनली आहे. सार्वजनिक विहिरीत टँकरचे पाणी सोडले की एकच झुंबड उडते अन् अर्ध्या तासात विहीर पुन्हा रिकामी केली जाते. काही ठिकाणी गल्लोगल्ली जाऊन प्रतिमाणसी मोजून पाणी दिले जाते.जनावरांच्या पाण्याचा हिशोब नाहीदररोज प्रतिव्यक्ती २० लिटर याप्रमाणे टँकरने पाणीपुरवठा केला जातो. या हिशोबाने लोकसंख्येच्या प्रमाणात तीन ते चार खेपा केल्या जातात. परंतु यामध्ये जनावरांसाठी पाण्याची तरतूद नसल्याने शेतकºयांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. छावण्या सुरू करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली असली तरी अद्याप जिल्ह्यात कोठेही छावणी सुरू झालेली नाही.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय