शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

निळवंडेतूनही सोडले पाणी

By admin | Updated: August 8, 2016 00:11 IST

राजूर/अकोले : उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा ठरलेले भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्यानंतर या धरणातील पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी गेल्या तीन-चार दिवसांपासून या धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.

राजूर/अकोले : उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा ठरलेले भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्यानंतर या धरणातील पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी गेल्या तीन-चार दिवसांपासून या धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे त्याखालील निळवंडे धरणातील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली. परिणामी रविवारी निळवंडेतूनही २ हजार क्युसेक वेगाने प्रवरा पात्रात पाणी सोडण्यात आले. दरम्यान, आज पाणलोटात पावसाचा जोर एकदमच ओसरला आहे.एक-दोन दिवस वगळता भंडारदरा धरणाच्या पाणलोटात मुसळधार पाऊस कोसळला. भंडारदरा भरल्यानंतर आता निळवंडेही भरण्याच्या मार्गावर आहे. रविवारी दुपारी निळवंडेचा साठा ७ हजार २०० द.ल.घ.फू.हून अधिक झाला. या धरणात पावसाळी परिस्थितीत ७ हजार द.ल.घ.फू ला पाणी पातळी स्थिर ठेवण्याचा विचार जलसंपदा विभागाने केल्यामुळे या धरणातून दुपारी दीड वाजता १ हजार ९९५ क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली, असे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले. रविवारी दिवसभर भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. भंडारदरा येथे तर दिवसभराच्या बारा तासांत अवघ्या ४ मि.मी. पावसाची नोंद झाली. संध्याकाळी ६ वाजता वीज निर्मितीसाठी टनेलमधून व अम्ब्रेला फॉलमधून एकूण १ हजार १७६ क्युसेकने विसर्ग सुरु होता. भंंडारदरा धरणातील पाणीसाठा १० हजार ५२० द.ल.घ.फू., तर निळवंडे धरणातील पाणीसाठा ७ हजार २३१ द.ल.घ.फू. होता. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत पडलेला पाऊस मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे : घाटघर १४२, भंडारदरा ५८, रतनवाडी १६९, वाकी १५५. (वार्ताहर)