निखाऱ्यावरुन चालत ‘त्यांनी’ फेडला नवस

By Admin | Updated: July 26, 2014 00:34 IST2014-07-25T23:28:47+5:302014-07-26T00:34:14+5:30

तिसगाव : ‘बजरंग बली की जय, हनुमान महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ’ या गगनभेदी घोषणा देत हजारो, महिला पुरुषांसह वृद्धांनी रखरखत्या लालबुंद विस्तवावर चालत जाऊन नवसपूर्ती केली.

Walking through the refined 'they' paid a vow | निखाऱ्यावरुन चालत ‘त्यांनी’ फेडला नवस

निखाऱ्यावरुन चालत ‘त्यांनी’ फेडला नवस

तिसगाव : ‘बजरंग बली की जय, हनुमान महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ’ या गगनभेदी घोषणा देत हजारो, महिला पुरुषांसह वृद्धांनी रखरखत्या लालबुंद विस्तवावर चालत जाऊन श्रीक्षेत्र हनुमान टाकळी (ता.पाथर्डी) येथे नवसपूर्ती केली.
रहाडाची अग्नीपूजा
सरपंच कुशिनाथ बर्डे, जिल्हा बँकेचे शाखाधिकारी विठ्ठल कराळे यांच्या हस्ते दुपारी चार वाजता रहाडाची अग्निपुजा झाली. सायंकाळी साडेपाच वाजता निखारे तयार झाल्यानंतर प्रथम मानकरी बाबासाहेब मारूती लोखंडे (वय २५) यांनी अग्नीकुंडला श्रीफळ वाहून निखाऱ्याची वाट चालली. त्याक्षणी समर्थ हनुमानाच्या उत्स्फूर्त घोषणांनी परिसर दणाणला. त्यानंतर रहाड खेळण्यास सुरुवात झाली. नवस पूर्तीबरोबर कुतूहल म्हणून राज्याच्या विविध भागांतून आलेल्या शिक्षितांसह युवक, युवतींनी रहाड प्रदक्षिणा घातली.
चौथी पिढी
धामणगाव, ता.आष्टी येथील लोखंडे घराण्याची रहाडातून प्रथम जाणारी ही चौथी पिढी तर आजचा मानकरी बाबासाहेब लोखंडे यांचे रहाडातून जाण्याचे हे सातवे वर्र्ष आहे.
हनुमान देवस्थानचे अध्यक्ष माधवस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील शेकडो युवकांनी यात्रा सुरळीतसाठी परिश्रम घेतले.
यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रात्री भजन, कीर्तन असे कार्यक्रम झाले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने हजर होते. (वार्ताहर)
तरीही इजा नाही
रखरखत्या लालबुंद विस्तवांवर चालत जाऊनही काहीही इजा होत नाही हे या यात्रेचे वैशिष्ट्य आहे. त्याची अनुभूती स्पर्धेच्या युगातही राज्याच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांनी घेतली.

Web Title: Walking through the refined 'they' paid a vow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.