टेलच्या शेतकर्यांना पाटपाण्याची प्रतीक्षा
By Admin | Updated: May 25, 2014 00:32 IST2014-05-24T23:57:59+5:302014-05-25T00:32:09+5:30
कुकाणा : मुळा धरणाचा पाणीपुरवठा सुरु होऊन जवळपास एक महिना उलटला तरी शिरसगाव परिसरातील टेल भागात अजूनही पाटपाणी पोहचले नाही.
टेलच्या शेतकर्यांना पाटपाण्याची प्रतीक्षा
कुकाणा : मुळा धरणाचा पाणीपुरवठा सुरु होऊन जवळपास एक महिना उलटला तरी शिरसगाव परिसरातील टेल भागात अजूनही पाटपाणी पोहचले नाही. त्यामुळे या भागातील पिकांची होळी होण्याच्या मार्गावर असल्याने पाटचारी पाणी सोडावे अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता चिलेखनवाडी येथे आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा तालुका मनसेचे कार्यकर्ते व साईश्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंकुश काळे यांनी दिला आहे. नेवासा तालुक्यातील शिरसगाव शाखा क्रमांक १ चे चारी नंबर २ हेडला उन्हाळा हंगाम २०१३-१४ अंतर्गत नंबर १ करिता २४ एप्रिलपासून पाणी सोडण्यात येत आहे. एक महिन्याचा कालावधी उलटूनही शाखेच्या कार्यक्षेत्रात असणार्या टेल भागातील वरखेड, माळेवाडी, खामगाव, गोपाळपूर, शिरसगाव, वाकडी, सुलतानपूर, गोयगव्हाण आदी भागातील शेतकर्यांना अद्यापही पाटपाणी पोहचले नाही. त्यामुळे या भागातील पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. गतवर्षी दुष्काळ, यावर्षी गारपीट आणि पाटबंधारे विभागाचा मनमानी कारभार यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. (वार्ताहर)