शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

केंद्र सरकारवर आरोप करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावं, विखे पाटलांनी शिवसेनेला फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 15:05 IST

विखेपाटील म्हणाले, केंद्र सरकारवर आरोप करण्यापलीकडे त्यांच्याकडे काय शिल्लक आहे

घारगाव : (जि. अहमदनगर) - शिवसेनेचं 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव निवडणूक आयोगाने गोठवलं आहे. उद्धव ठाकरे तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंधेरी-पूर्व निवडणुकीत हे चिन्ह वापरता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी केंद्र सरकार हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे. या आरोपाला भाजपचे नेते व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना उत्तर दिले आहे.

विखेपाटील म्हणाले, केंद्र सरकारवर आरोप करण्यापलीकडे त्यांच्याकडे काय शिल्लक आहे. त्यांनी जनाधार गमावला,सरकार गमवलं.त्यांना आता स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. राहिलेले थोडेफार जे काही संघटन आहे ते कसे टिकवता येईल त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आता पर्यंत दुर्दैवाने त्यांना चुकीचे सल्लागार मिळाले होते. त्यांचे प्रवक्ते बेताल विधाने करत होते. सत्याचा विजय होतोच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दृष्टीने हा फार मोठा विजय आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा मोठा नैतिक पराभव असल्याचे महसूलमंत्री विखे म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील