शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

पाण्यासाठी सरकारला भीक मागावी लागते, हे दुर्दैव : मानसी नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 13:22 IST

पाण्यासाठी सरकारला भीक मागावी लागते. यासारखे दुसरे दुर्दैव काय कमर्शियल फायदा घ्यायचा किंवा फेमस होण्यासाठी येथे आलेले नाही.

योगेश गुंडअहमदनगर : एखाद्या कलाकाराने सामाजिक प्रश्नांसाठी केलेले उपोषण किंवा आंदोलन हे काही सिनेमाचे शुटिंग नसते. त्याच्यातील माणुसकी दाखवण्यासाठी तो सामाजिक लढ्यात सहभागी होऊन सरकारशी भांडत असतो. मात्र त्याचा चुकीचा अर्थ काढून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असते हे संतापजनक आहे. टीक टॉकवर ग्रामीण ढंग फारच फेमस होत आहेत. मात्र ग्रामीण भागातील पाणी टंचाईसारख्या समस्या का फेमस होत नाहीत? असा सवाल अभिनेत्री मानसी नाईक यांनी उपस्थित केला.अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी साकळाई जलसिंचन योजनेच्या मंजुरीसाठी उपोषण सुरू केले आहे. त्यास पाठिंबा देण्यासाठी मानसी नाईक नगरला आल्या होत्या. त्यावेळी तिच्याशी झालेली बातचीत अशी.उपोषणाला पाठिंबा देण्यामागची भूमिका काय ?मी टाळ्या घेण्यासाठी येथे आले नाही. दीपाली माझी सावली आहे. पाण्यासाठी सरकारला भीक मागावी लागते. यासारखे दुसरे दुर्दैव काय कमर्शियल फायदा घ्यायचा किंवा फेमस होण्यासाठी येथे आलेले नाही.ग्रामीण भागातील प्रश्नाविषयी आपले मत काय?सध्या टीक टॉकवर ग्रामीण भाग जोरात आहे. अस्सल ग्रामीण भाषेतील व्हिडिओ लवकर फेमस होतात. मग टीक टॉकमधून ग्रामीण भागातील समस्या का दाखवल्या जात नाहीत?सरकारने आंदोलनाकडे दुर्लक्ष केले का?सरकारला वाटते दीपालीला निवडणुकीत उभे राहायचे आहे. म्हणून तिच्या उपोषणाकडे दुर्लक्ष होत आहे. पण हा काही सिनेमातील सीन नाही. कोणीही आमरण उपोषण करून दाखवावे माझे चॅलेंज आहे. हे सोपे काम नाही. सरकारचा एकही प्रतिनिधी उपोषण थांबवण्यासाठी पुढे येत नाही.चाहत्यांना काय संदेश द्याल?कलाकारांचे आंदोलन हे काय सिनेमातील शुटिंग नसते. नुसते येऊन पाहू नका. त्यास पाठिंबा द्या. काहीजण फक्त नटी आहे म्हणून पाहतात व निघून जातात. हे योग्य नाही यास सर्वांचा पाठिंबा मिळायला हवा. फक्त सेल्फी व पोस्ट टाकू नका.तुमचा पाणी टंचाईशी संबंध आला का?मी पुण्या, मुंबईत वाढले आहे. अस्सल पुणेकर आहे. लहानपणापासून लाडात वाढली असल्याने पाण्यावाचून ग्रामीण भाग कसा तळमळतो हे पहिल्यांदा पाहत आहे. मुंबई पुण्यात माणुसकी हरवत चालली आहे. खरी माणुसकी ग्रामीण भागात पाहायला मिळते.टीक टॉकवर ग्रामीण ढंग फारच फेमस होत आहेत. मात्र पाणी टंचाईसारख्या समस्या का फेमस होत नाहीत? - मानसी नाईक

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSujay Vikheसुजय विखेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलMansi Naikमानसी नाईक