शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेरजवळ भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू, 4 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 12:21 IST

ट्रक व कारच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देट्रक व कारच्या धडकेत झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर कासारा-दुमाला गावच्या शिवारात हा अपघात झाला. जखमींवर संगमनेरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

संगमनेर : ट्रक व कारच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी (18 जानेवारी) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर कासारा-दुमाला गावच्या शिवारात हा अपघात झाला. 

भूषण दिलीप वाळेकर (33), आर्यन जयंत सांत्रस (14)अशी अपघातातील मृतांची नावं आहेत. जयंत शामसुंदर सांत्रस, मोहिनी जयंत सांत्रस (42), उषा शरद लोहारकर (60), देवयानी भूषण वाळेकर (23) हे चार जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक पंकज निकम, पोलीस हेड काँस्टेबल विजय खंडीझोड, पोलीस नाईक सचिन उगले आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातातील जखमींना रुग्णालयात हलविले. भूषण वाळेकर व आर्यन सांत्रस यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कॉटेज रूग्णालयात नेण्यात आले असून जखमींवर संगमनेरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAhmednagarअहमदनगर