शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

‘त्या’ शिक्षकांची बदली शिक्षणाधिकारी स्तरावरच; औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय : शिक्षकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 06:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहिल्यानगर : शिक्षक , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विनाअनुदानित पदावरून अनुदान पदावर बदली करण्याचे अधिकार मंत्रालयाऐवजी शिक्षणाधिकारी व ...

लोकमत न्यूज नेटवर्कअहिल्यानगर : शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विनाअनुदानित पदावरून अनुदान पदावर बदली करण्याचे अधिकार मंत्रालयाऐवजी शिक्षणाधिकारी व उपसंचालकस्तरावर देण्याचा महत्त्वपूर्ण निकाल औरंगाबाद खंडपीठाने दिला. त्यामुळे मंत्रालयस्तरावरील चकरा थांबून शिक्षकांना दिलासा मिळाला. याबाबत शिक्षक भारती संघटनेच्या विनाअनुदान विरोधी कृती समितीच्या राज्याध्यक्षा रूपाली कुरूमकर यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.

पूर्वी खासगी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची विनाअनुदानित किंवा अंशत: अनुदानित तुकडीतून अनुदानित तुकडीत बदली केली तर त्याला उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागत होती. त्यात शिक्षकांचा वेळ, पैसा जात होता. ही गैरसोय लक्षात घेता २९ एप्रिल २०२४ रोजी शिक्षण विभागाने आदेश काढून अशा बदलीचे प्रस्ताव मंत्रालयात शिक्षण विभागातून मंजूर करण्याचा निर्णय घेतला. शिक्षण विभागाच्या या आदेशामुळे विनाअनुदानित पदावर काम करणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळाला; परंतु मंत्रालयस्तरावर प्रस्ताव मंजुरीस वेळ जात होता. तसेच, महाराष्ट्र शाळा कर्मचारी सेवाशर्ती अधिनियम १९७७ व नियमावली १९८१ मधील बदलीसंदर्भात नियम ‘४१-अ’चे उल्लंघन होत होते. त्यामुळे कुरूमकर यांनी खंडपीठात याचिका दाखल करून विनाअनुदानित ते अनुदानित बदलीचे मान्यता प्रस्ताव  मंत्रालयाऐवजी शिक्षणाधिकारी, उपसंचालकांना द्यावेत, अशी मागणी केली होती. त्यांच्या बाजूने खंडपीठाने ३ फेब्रुवारी २०२५ रोजी निर्णय दिला आहे.  

चार आठवड्यांत बदलीला मान्यता द्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विनाअनुदानित ते अनुदानित बदली प्रस्ताव शिक्षणाधिकारी, तसेच उपसंचालकस्तरावर मंजूर करावेत. तसेच बदली प्रस्ताव दाखल झाल्यापासून ४ आठवड्यांत त्याला मान्यता द्यावी, असेही न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक