शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

शेतकऱ्यांची व्यथा; एकरी खर्च २५ हजार, मिळणार आठ हजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 06:20 IST

अहमदनगरमध्ये सोयाबीन, बाजरी, कपाशी, कांदा पिकांचे नुकसान

अहमदनगर : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवेळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. कपाशी, सोयाबीन, कांदा, बाजरी ही पिके भुईसपाट झाली. कांदा सडल्याने शेतकरी खचला. राज्य शासनाने प्रति हेक्टरला आठ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. प्रत्यक्षात नुकसान झालेल्या पिकांना एकाच एकरावरील पिकांसाठी २० ते २५ हजार रुपये खर्च झाला आहे. त्यामुळे सरकारची हेक्टरवरील पिकांसाठी (अडीच एकर) आठ हजार रुपये जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचे स्पष्ट झाले आहे.‘लोकमत’ने अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी, श्रीगोंदा, नगर, पारनेर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकांसाठी झालेल्या खर्चाची माहिती घेतली. राहुरी तालुक्यात सोयाबीनचे नुकसान झाले. नांगरणी (१६०० रुपये), हारू- रोटा वेटर (१२००)खुरपणी (५००), पेरणी (५००), खुरपणी (४०००), खुरपणी (१०००), खते (१२००) बियाणे (२१००), खळे (१५००), पाणी (२०००), शेतकरी श्रममूल्य (८०००) असा शेतकºयांनी सोयाबीन पिकावर एकरी २२ हजार ८०० रूपये खर्च केला. एकरी सोयाबीनचे एकरी उत्पादन ८ क्ंिवटल गृहीत धरले जाते़ सोयाबीनला ३५०० रूपये प्रतिक्ंिवटल भाव गृहीत धरला तर २८००० रूपये उत्पन्न मिळते़ शेतकऱ्यांना एकरी ५२०० रूपये नफा मिळाला असता. पारनेरचे शेतकरी कांतीलाल सोंडकर म्हणाले, कांदा लागवडीसाठी मजूर आळेफाटा, जुन्नरहून आणावे लागतात. दररोज दहा मजुरांना प्रत्येकी तीनशे रूपये रोजंदारी द्यावी लागते. तीन ते चार हजार खर्च खते, औषध फवारणीवर होतो. वीजबिलासह इतर मोठा खर्च आहे. लागवड ते काढणीपर्यंत दीड एकर क्षेत्रासाठीच ३२ हजार रूपये खर्च येतो.हेक्टरी २५ हजार रूपयांचा खर्च करून शेतकरी बाजरीचे उत्पादन घेतो. बियाणे- १,५००, पेरणी- २,५००, काढणी- ६ हजार, खते व पाणी, सोंगणी आणि नांगरट प्रत्येकी ५ हजार, असा हेक्टरी जवळपास २५ हजार रूपयांचा खर्च येतो, असे सारोळा बद्दी (ता. नगर) येथील शेतकरी तुकाराम लांडगे यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी