शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची व्यथा; एकरी खर्च २५ हजार, मिळणार आठ हजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 06:20 IST

अहमदनगरमध्ये सोयाबीन, बाजरी, कपाशी, कांदा पिकांचे नुकसान

अहमदनगर : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवेळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. कपाशी, सोयाबीन, कांदा, बाजरी ही पिके भुईसपाट झाली. कांदा सडल्याने शेतकरी खचला. राज्य शासनाने प्रति हेक्टरला आठ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. प्रत्यक्षात नुकसान झालेल्या पिकांना एकाच एकरावरील पिकांसाठी २० ते २५ हजार रुपये खर्च झाला आहे. त्यामुळे सरकारची हेक्टरवरील पिकांसाठी (अडीच एकर) आठ हजार रुपये जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचे स्पष्ट झाले आहे.‘लोकमत’ने अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी, श्रीगोंदा, नगर, पारनेर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकांसाठी झालेल्या खर्चाची माहिती घेतली. राहुरी तालुक्यात सोयाबीनचे नुकसान झाले. नांगरणी (१६०० रुपये), हारू- रोटा वेटर (१२००)खुरपणी (५००), पेरणी (५००), खुरपणी (४०००), खुरपणी (१०००), खते (१२००) बियाणे (२१००), खळे (१५००), पाणी (२०००), शेतकरी श्रममूल्य (८०००) असा शेतकºयांनी सोयाबीन पिकावर एकरी २२ हजार ८०० रूपये खर्च केला. एकरी सोयाबीनचे एकरी उत्पादन ८ क्ंिवटल गृहीत धरले जाते़ सोयाबीनला ३५०० रूपये प्रतिक्ंिवटल भाव गृहीत धरला तर २८००० रूपये उत्पन्न मिळते़ शेतकऱ्यांना एकरी ५२०० रूपये नफा मिळाला असता. पारनेरचे शेतकरी कांतीलाल सोंडकर म्हणाले, कांदा लागवडीसाठी मजूर आळेफाटा, जुन्नरहून आणावे लागतात. दररोज दहा मजुरांना प्रत्येकी तीनशे रूपये रोजंदारी द्यावी लागते. तीन ते चार हजार खर्च खते, औषध फवारणीवर होतो. वीजबिलासह इतर मोठा खर्च आहे. लागवड ते काढणीपर्यंत दीड एकर क्षेत्रासाठीच ३२ हजार रूपये खर्च येतो.हेक्टरी २५ हजार रूपयांचा खर्च करून शेतकरी बाजरीचे उत्पादन घेतो. बियाणे- १,५००, पेरणी- २,५००, काढणी- ६ हजार, खते व पाणी, सोंगणी आणि नांगरट प्रत्येकी ५ हजार, असा हेक्टरी जवळपास २५ हजार रूपयांचा खर्च येतो, असे सारोळा बद्दी (ता. नगर) येथील शेतकरी तुकाराम लांडगे यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी