शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

मेंहदी लावायच्या हातावर सॅनिटायझर चोळण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लोणीः कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिणामी राहाता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लोणीः कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिणामी राहाता तालुक्यातील शेकडो वधू-वरपित्यांची चिंता वाढली आहे. अनेकांच्या निघालेल्या लग्नतारखा पुढे ढकलाव्या लागल्या, तर अनेकांनी आहे त्या स्थितीत १५ ते २५ जणांच्या साक्षीने विवाह उरकले. मात्र, त्यामुळे यंदा कर्तव्य असणाऱ्या जोडप्यांमध्ये धाकधूक वाढली असून, मेहंदी लावायच्या हातावर सॅनिटायझर चोळत बसण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

लग्नसराईचा खरा मौसम एप्रिल-मे या दोन महिन्यातच असतो. या दोन महिन्यात लग्नतारखा व विवाह मुहूर्त होते. अगोदरच सहा महिन्यांपासून वधू-वरपित्यांनी विवाहाची तारीख निश्चित करून मंगल कार्यालय बुक केले होते. लग्नसराईची लगबग व धावपळही बऱ्याच प्रमाणात सुरू होती. मात्र, मार्चअखेर व एप्रिल महिन्याच्या प्रारंभीपासूनच कोरोना संसर्गाबाबत जनजागृती वाढली. अचानकच कोरोनाचा प्रसार होऊ नये. यासाठी लॉकडाऊन व कडक निर्बंध लागू करण्यात आले. या लॉकडाऊनचा वाढता कालावधी वधू वर पित्यांसाठी चिंतेचा विषय ठरला. लॉकडाऊनमुळे व संचारबंदीमुळे मोठ्या प्रमाणात निर्बंध आले.

जिथे घराच्या बाहेर निघण्याची सोय नाही तिथे विवाह तर दूरच राहिले. विवाहाच्या निमित्ताने अनेकांनी पत्रिका, कपड्यांचे बस्ते व विविध प्रकारची तयारी केली होती. वधू-वरही आपापल्या परीने तयारी लागले होते. अशातच या लॉकडाऊनने त्यांच्या आनंदावर विरजण पडले. ज्या हातांवर मेहंदी लावायची, आता त्या हातावर सॅनिटायझर चोळण्याची वेळ आली आहे.

विवाह संस्था लॉकडाऊनमध्ये ठप्प राहिल्याने कपडा, सोने, सौंदर्यप्रसाधने, मंगल कार्यालय, बॅण्ड, केटरिंग, आचारी, बांगड्या, भांडी, फर्निचर यांच्यासह विविध दुकानेही बंद आहेत. त्यांनाही या लग्नसराईचा मोठा फटका कोरोनामुळे सहन करावा लागत आहे.

.

.......

विवाह मुहूर्तांची घाई करू नये

महामारीच्या संकटामुळे शासनाने लॉकडाऊनच्या माध्यमातून कडक निर्बंध घातले आहे. त्यातच विवाह समारंभासदेखील बंदी घातलेली आहे. तरीही अनेक वर व वधू पिता लपून छपून विवाह आयोजित करत आहेत. पुढील काही महिन्यात मुहूर्त नाहीत, असा चुकीचा समज करून विवाह समारंभ आयोजित केल्यामुळे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. पुढील काळात अनेक मुहूर्त असून नागरिकांनी विवाह मुहूर्ताची घाई करू नये, असे राहता येथील ज्योतिषाचार्य अनंत शास्त्री लावर यांनी म्हटले आहे.

.........

नोंदणी विवाह करणे झाले अवघड....

कोरोनाच्या संकटामुळे गर्दी न करता मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत विवाह आटोपता घ्यावा असा प्रयत्न असलेल्या अनेकांनी नाइलाजाने नोंदणी विवाहाचा मार्ग निवडला. पण, सध्या लॉकडाऊनमुळे हाही मार्ग अवघड होऊन बसला आहे.

.........

जुळलेले लग्न लॉकडाऊनमध्ये हाईना...

प्रत्येक समाजात मुलींची कमी असणारी संख्या आणि त्यांच्या वाढलेल्या अपेक्षा यामुळे मुलांची लग्न जमणे, हीच मोठी डोकेदुखी झाली आहे. अशाही स्थितीत वधू संशोधन झाले. लग्न जुळले अन् जुळलेले लग्न लॉकडाऊनमुळे होईना, अशी अनेकांची स्थिती झाली आहे.