शहरं
Join us  
Trending Stories
1
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
2
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
3
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
4
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
5
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
6
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
7
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
8
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
9
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
10
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
11
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
12
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
14
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
15
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
16
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
17
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
18
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
19
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
20
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या मुलींचे अन्नत्याग आंदोलन मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 14:09 IST

पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या मुलींचे अन्नत्याग आंदोलन शनिवारी (9 फेब्रुवारी) मागे घेण्यात आले आहे. अर्जुन खोतकरांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

ठळक मुद्देपुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या मुलींचे अन्नत्याग आंदोलन शनिवारी (9 फेब्रुवारी) मागे घेण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाकडून आंदोलनादरम्यान झालेल्या दडपशाहीच्या प्रकारची चौकशी करणार असल्याची माहिती खोतकर यांनी दिली.आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर दोन दिवसांनी 11 फेब्रुवारीपासून अधिक तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मुलींनी दिला आहे. 

अहमदनगर - पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या मुलींचे अन्नत्याग आंदोलन शनिवारी (9 फेब्रुवारी) मागे घेण्यात आले आहे. पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. पोलीस प्रशासनाकडून आंदोलनादरम्यान झालेल्या दडपशाहीच्या प्रकारची चौकशी करणार असल्याची माहिती खोतकर यांनी दिली. तसेच आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर दोन दिवसांनी 11 फेब्रुवारीपासून अधिक तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मुलींनी दिला आहे. 

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, संपूर्ण कर्जमाफी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत, कृषीसंलग्न वस्तुंवरील जीएसटीतून माफी, सुक्ष्मसिंचन, कृषी अवजारांवरांना शंभर टक्के अनुदान, शेतीमालाला हमीभाव, दुधाचे दर वाढून मिळावेत, अशा अनेक मागण्यांसाठी पुणतांब्यातील तीन मुलींनी अन्यत्याग आंदोलन सुरू केलं होतं.  आज या आंदोलनाचा सहावा दिवस होता. शुक्रवारी पालकमंत्री राम शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली. मात्र ती निष्फळ ठरली होती.

पुणतांब्यातील आंदोलक मुलींची रुग्णालयात रवानगी; पोलिसांनी बळजबरीनं कारवाई केल्याचा आरोप

पुणतांब्यातील आंदोलनकर्त्या मुलींना रात्री उशिरा पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं. यावरुन पुणतांब्यात तणाव निर्माण झाला होता. तसेच पोलिसांनी बळजबरीने ही कारवाई केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. गेल्या पाच दिवसांपासून पुणतांब्यातील शेतकरी कन्यांचं विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू होतं. सर्व मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असा इशारा या मुलींनी दिला होता. 

अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या शुभांगी जाधव या मुलीला अस्वस्थ वाटू लागल्यानं तिला रात्री अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर पोलिसांनी तिच्या सोबत आंदोलन करत असलेल्या मुलींचीही रुग्णालयात रवानगी केली होती. मुलींची प्रकृती खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र पोलिसांनी बळजबरीनं कारवाई केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. रात्री दीड वाजता पोलिसांनी आंदोलनकर्त्या मुलींना शासकीय रुग्णालयात दाखल केलं. यावेळी काही ग्रामस्थांनादेखील ताब्यात घेण्यात आलं. यामुळे पुणतांब्यात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरीagitationआंदोलनArjun Khotkarअर्जुन खोतकर