शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

दुष्काळसाठी पंचांग पाहण्याची गरज नाही : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 12:07 IST

दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंचांग पाहण्याची गरज नाही. केंद्राच्या समित्या बोलविण्याचा व पालकमंत्र्यांच्या दौऱ्यांचा फार्सही त्यांनी करु नये.

अहमदनगर : दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंचांग पाहण्याची गरज नाही. केंद्राच्या समित्या बोलविण्याचा व पालकमंत्र्यांच्या दौऱ्यांचा फार्सही त्यांनी करु नये. शेतकरी होरपळत असल्याने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी येथे ‘लोकमत’शी संवाद साधताना केली.जनसंघर्ष यात्रेनिमित्त चव्हाण जिल्ह्याच्या दौ-यावर आले असता त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली़ ते म्हणाले, मुख्यमंत्री ३१ आॅक्टोबरपर्यंत दुष्काळ जाहीर करु असे सांगत आहेत. अजून यांचे पाहणी दौरेच व्हायचे आहेत. पडलेला पाऊस, धरणातील पाणीसाठे आणि उपलब्ध चारा याचे अहवाल असताना सरकार आणखी कशाची वाट पाहत आहे? कापसावर बोंडअळी व उसावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव आहे. शेतक-यांना विजेचे रोहित्र मिळत नाहीत़ भारनियमन सुरू आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे.जनता आता या सरकारचाच ‘लोड’ कमी करण्याच्या विचारात आहे.यंत्रणेचा दुरुपयोग करुन सरकार व्यापा-यांवर छापे टाकत आहे. गुजरात निवडणुकीच्या पूर्वीही व्यापा-यांना अशीच भीती दाखविण्यात आली. शेअर बाजार कोसळला आहे. रुपयाचे अवमूल्यन झाले आहे. त्यामुळे सर्वच जनता त्रस्त असल्याचे ते म्हणाले. कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत व सरचिटणीस विनायक देशमुख यावेळी त्यांच्यासमवेत होते.नगर मतदारसंघाबाबत राष्ट्रवादीशी चर्चा करूअहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी डॉ़ सुजय विखे इच्छुक आहेत ही वस्तुस्थिती आहे़ मात्र हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याबाबत राष्ट्रवादीसोबत अद्याप औपचारिक चर्चा झालेली नाही़ काँग्रेसपक्षांतर्गत याबाबत निर्णय होऊन नंतर राष्ट्रवादीसोबत चर्चा केली जाईल़ राष्ट्रवादी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यास तयार नाही, याकडे लक्ष वेधले असता चव्हाण म्हणाले, प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने तयारी करत असतो़ त्यांची ४८ मतदारसंघ लढण्याची तयारी असल्यास आमचीही ती असतेच.निवडणुका आल्या की सेनेला राम आठवतोराम मंदिराचा मुद्दा शिवसेनेने काढला याचा अर्थच असा की निवडणुका आल्या आहेत. निवडणूक आली की सेनेला हा मुद्दा आठवतो. भाजप-सेना एकच आहेत. ते भांडणाचा फार्स करतात. सनातन संस्था दहशती कृत्य करत आहे हे उघड झाले आहे. नव्याने समोर आलेल्या स्टिंगमधूनही ते दिसते. परंतु भाजप सरकार या संघटनेबाबत नरम धोरण घेत आहे. संजय राऊत ‘सनातन’च्या कार्यक्रमाला जाणार आहेत कारण सेनाही त्यांना पाठिशी घालते, असे चव्हाण म्हणाले.राष्टÑवादीसोबत १२ रोजी मतदारसंघनिहाय चर्चाराष्ट्रवादीने कॉंग्रेसकडे लोकसभेचे काही मतदारसंघ मागितले आहेत याकडे लक्ष वेधले असता चव्हाण म्हणाले, प्रत्येक मतदारसंघ निहाय कॉंग्रेसची येत्या ११ तारखेला बैठक आहे. त्यानंतर राष्टÑवादीसोबत १२ आॅक्टोबरला बैठक होईल. प्रकाश आंबेडकरांसोबतही बोलणी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. आंबेडकरांनी अद्याप जागांचा प्रस्ताव दिलेला नाही़ पहिल्या टप्यात त्यांच्यासोबत राधाकृष्ण विखे व माणिकराव ठाकरे यांनी चर्चा केलेली आहे़ ते एमआयएमसोबत गेले असले तरी त्यांनी आम्हाला नकार दिलेला नाही.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcongressकाँग्रेस