शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

दुष्काळसाठी पंचांग पाहण्याची गरज नाही : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 12:07 IST

दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंचांग पाहण्याची गरज नाही. केंद्राच्या समित्या बोलविण्याचा व पालकमंत्र्यांच्या दौऱ्यांचा फार्सही त्यांनी करु नये.

अहमदनगर : दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंचांग पाहण्याची गरज नाही. केंद्राच्या समित्या बोलविण्याचा व पालकमंत्र्यांच्या दौऱ्यांचा फार्सही त्यांनी करु नये. शेतकरी होरपळत असल्याने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी येथे ‘लोकमत’शी संवाद साधताना केली.जनसंघर्ष यात्रेनिमित्त चव्हाण जिल्ह्याच्या दौ-यावर आले असता त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली़ ते म्हणाले, मुख्यमंत्री ३१ आॅक्टोबरपर्यंत दुष्काळ जाहीर करु असे सांगत आहेत. अजून यांचे पाहणी दौरेच व्हायचे आहेत. पडलेला पाऊस, धरणातील पाणीसाठे आणि उपलब्ध चारा याचे अहवाल असताना सरकार आणखी कशाची वाट पाहत आहे? कापसावर बोंडअळी व उसावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव आहे. शेतक-यांना विजेचे रोहित्र मिळत नाहीत़ भारनियमन सुरू आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे.जनता आता या सरकारचाच ‘लोड’ कमी करण्याच्या विचारात आहे.यंत्रणेचा दुरुपयोग करुन सरकार व्यापा-यांवर छापे टाकत आहे. गुजरात निवडणुकीच्या पूर्वीही व्यापा-यांना अशीच भीती दाखविण्यात आली. शेअर बाजार कोसळला आहे. रुपयाचे अवमूल्यन झाले आहे. त्यामुळे सर्वच जनता त्रस्त असल्याचे ते म्हणाले. कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत व सरचिटणीस विनायक देशमुख यावेळी त्यांच्यासमवेत होते.नगर मतदारसंघाबाबत राष्ट्रवादीशी चर्चा करूअहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी डॉ़ सुजय विखे इच्छुक आहेत ही वस्तुस्थिती आहे़ मात्र हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याबाबत राष्ट्रवादीसोबत अद्याप औपचारिक चर्चा झालेली नाही़ काँग्रेसपक्षांतर्गत याबाबत निर्णय होऊन नंतर राष्ट्रवादीसोबत चर्चा केली जाईल़ राष्ट्रवादी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यास तयार नाही, याकडे लक्ष वेधले असता चव्हाण म्हणाले, प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने तयारी करत असतो़ त्यांची ४८ मतदारसंघ लढण्याची तयारी असल्यास आमचीही ती असतेच.निवडणुका आल्या की सेनेला राम आठवतोराम मंदिराचा मुद्दा शिवसेनेने काढला याचा अर्थच असा की निवडणुका आल्या आहेत. निवडणूक आली की सेनेला हा मुद्दा आठवतो. भाजप-सेना एकच आहेत. ते भांडणाचा फार्स करतात. सनातन संस्था दहशती कृत्य करत आहे हे उघड झाले आहे. नव्याने समोर आलेल्या स्टिंगमधूनही ते दिसते. परंतु भाजप सरकार या संघटनेबाबत नरम धोरण घेत आहे. संजय राऊत ‘सनातन’च्या कार्यक्रमाला जाणार आहेत कारण सेनाही त्यांना पाठिशी घालते, असे चव्हाण म्हणाले.राष्टÑवादीसोबत १२ रोजी मतदारसंघनिहाय चर्चाराष्ट्रवादीने कॉंग्रेसकडे लोकसभेचे काही मतदारसंघ मागितले आहेत याकडे लक्ष वेधले असता चव्हाण म्हणाले, प्रत्येक मतदारसंघ निहाय कॉंग्रेसची येत्या ११ तारखेला बैठक आहे. त्यानंतर राष्टÑवादीसोबत १२ आॅक्टोबरला बैठक होईल. प्रकाश आंबेडकरांसोबतही बोलणी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. आंबेडकरांनी अद्याप जागांचा प्रस्ताव दिलेला नाही़ पहिल्या टप्यात त्यांच्यासोबत राधाकृष्ण विखे व माणिकराव ठाकरे यांनी चर्चा केलेली आहे़ ते एमआयएमसोबत गेले असले तरी त्यांनी आम्हाला नकार दिलेला नाही.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcongressकाँग्रेस