शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

‘विधानसभाध्यक्षांनी निरपेक्ष बुद्धीने निर्णय द्यावा’; काय म्हणतात विविध राजकीय पक्षांचे नेते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 07:21 IST

विधानसभेचे अध्यक्षपद कोणत्याही पक्षाशी निगडित नसून स्वतंत्र आणि स्वायत्त असते.

संगमनेर (जि. अहमदनगर) : विधानसभेचे अध्यक्षपद कोणत्याही पक्षाशी निगडित नसून स्वतंत्र आणि स्वायत्त असते. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वायत्त पद्धतीने आणि निरपेक्ष बुद्धीने निर्णय द्यावा, अशी अपेक्षा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

अखेर भरत गोगावलेंना मिळणार तरी काय? पक्षप्रतोद पदही गेल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय

राज्य सरकारबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर भाष्य करताना थोरात म्हणाले की,पक्षांतर बंदीचा कायदा यासाठी केला आहे की, कोणीही फोडाफोडी करू नये. मूळ शिवसेनेतून फुटलेल्या आमदारांबाबत विधानसभा अध्यक्षांनी नि:पक्षपातीपणे निर्णय घ्यावा.‘सर्वोच्च न्यायालयाने संवैधानिक पदावर असलेले राज्यपाल, विधिमंडळ अध्यक्षांवर ओढलेले ताशेरे यावरून हे सरकार बेकायदा पद्धतीने अस्तित्वात आले आहे. यामुळे सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारने नैतिकतेच्या आधारावर तत्काळ राजीनामा दिला पाहिजे,’ अशी ठोस मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

 शिंदे सरकार थोड्या दिवसांसाठी वाचलेले आहे. आमदारांच्या अपात्रतेची कारवाई विधानसभा अध्यक्षांकडे पाठवलेली आहे. सुनिल प्रभू यांनी बजावलेल्या व्हीपचे उल्लंघन झालेले आहे, असे ठाकरे गटाचे आमदार ॲड. अनिल परब म्हणाले. 

हे सरकार पूर्णपणे घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे. यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. शिंदे आणि फडणवीस यांनी उगाच पेढे वाटू नये. आपण बेकायदेशीर सरकारचे प्रतिनिधीत्व करता. नैतिकता असेल आणि खोक्यांचे पाप धुवायचे असेल तर, सरकारने राजीनामा द्यावा, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

शिंदे सरकार जरी वाचले असले तरी त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नोंदवले आहे. तर राज्याला स्थिर सरकार मिळण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असून हा लोकशाहीचा विजय आहे, अशी प्रतिक्रिय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली. कोर्टाने दिलासा दिल्याने मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला धोका नाही. खैरे पाण्यात देव बुडवून बसले आहेत. त्यांना म्हणा तुम्ही अशीच यज्ञ, पुजा करत बसा,अशी प्रतिक्रिया रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी व्यक्त केली. 

आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, विरोधक आता ओरडत सुटले आहेत. संजय राऊत यांना गुवाहाटीच्या झाडीत नेऊन टाका म्हणजे महाराष्ट्र शांत राहील. आजच्या निकालाने सरकार स्थिर झाले आहे. त्यामुळे कोर्टाचे धन्यवाद. विधीमंडळाचे पावित्र्य न्यायालयाने शाबूत ठेवले आहेआम्हाला कोर्टाचा निर्णय मान्य आहे. कसे बेकायदेशीर ठरवलं आहे ते आमचे विधीतज्ज्ञ पाहतील आणि जे काही ठरवतील त्यात आम्हाला समाधावे मानावं लागेल, अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी नोंदवली. 

सर्वोच्च न्यायालयान गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवलेली नाही. न्यायालयाने प्रक्रियेचे पालन करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आम्ही प्रक्रियेचे पालन करून गोगावले यांची पुन्हा नियुक्ती करू. अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.

नैतिकतेवर द्या राजीनामा...

सर्वाेच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर दिलेल्या निर्णयानंतर राजकीय नेत्यांकडून वेगवेगळी मते मांडली आहेत. नैतिकतेच्या आधारे शिंदे-फडणवीस सरकारने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. तर सरकार उलट स्थिर झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला काेणताही धाेका नाही, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया शिंदे गटाच्या नेत्यांनी दिल्या आहेत.  

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेस